Chanakya Niti | आचार्य चाणक्यांच्या मते, स्वत:चा आत्मसन्मान प्रिय असेल तर या 5 ठिकाणी अजिबात राहू नका

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्य नीती या पुस्तकात अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात खूप उपयुक्त ठरतात. आचार्य चाणक्यांच्या मते व्यक्ती ज्या पर्यावरणावर मोठा प्रभाव पडतो. तो ज्या ठिकाणी राहतो, त्या जागेचाही संबंध व्यक्तीच्या प्रगतीशी असतो. म्हणून, निवासाची निवड काळजीपूर्वक केली पाहिजे. आचार्य चाणक्य यांनी अशा 5 जागा सांगितल्या आहेत, स्वत:चा आत्मसन्मान प्रिय असेल तर या 5 ठिकाणी अजिबात राहू नका असे सांगितले आहे.

Mrunal Patil | Updated on: Feb 03, 2022 | 7:48 AM
1 / 6
'यस्मिन् देशे न समनो न वृत्तिर्णं च बंधवह, न च विद्यागमोमप्यास्ति वसात्र न करायेत्' या श्लोकात आचार्य चाणक्यांनी (Acharya Chankaya) ज्ञानी व्यक्ती या ठिकाणी राहण्याचा विचारही मनात आणत नाही.

'यस्मिन् देशे न समनो न वृत्तिर्णं च बंधवह, न च विद्यागमोमप्यास्ति वसात्र न करायेत्' या श्लोकात आचार्य चाणक्यांनी (Acharya Chankaya) ज्ञानी व्यक्ती या ठिकाणी राहण्याचा विचारही मनात आणत नाही.

2 / 6

माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. त्यामुळे जिथे माणसाला आदर नाही, अशा ठिकाणी माणसाने राहू नये. आदर हा माणसाचा अलंकार आहे, जो वर्षानुवर्षे कष्टाने मिळतो.

3 / 6

जिथे आपूलकीची माणसं नसतात, जिथे लोक तुम्हाला समजून घेत नाही त्या ठिकाणी तुम्हा राहू नये. जिथे लोक फक्त तुमचा वापर करत असतील अशा ठिकाणी तर अजिबात राहू नये.

4 / 6

ज्या ठिकाणी रोजगाराचे साधन नाही अशा ठिकाणी राहणे देखील मूर्खपणाचे लक्षण आहे. माणसाच्या गरजा पैशानेच पूर्ण होतात. कमाईचे साधन नसेल तर माणसाचे जगणे कठीण होऊन बसते.

5 / 6

शिक्षणाचे साधन नसलेल्या ठिकाणी राहून उपयोग नाही. अशा ठिकाणी तुमच्या मुलाच्या आयुष्यावरही परिणाम होईल. त्यामुळे जिथे खूप काही शिकता येईल किंवा पूरक वातावरण असेल अशा ठिकाणीच राहा.

6 / 6

माणसाचा विकास तेव्हाच होतो जेव्हा तो वेगाने शिकतो आणि वेळेनुसार पुढे जातो. त्यामुळे ज्या ठिकाणी शिकण्यासारखे काही नाही, ती जागाही सोडून दिली पाहिजे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us