
कोरोना माहामारीत हाताचे काम गेले. अशातच अतिवृष्टीत पुन्हा कंबरडे मोडले. अशात नवरात्र महोत्सव आहे. त्यामुळे याच गरजू कुटुंबातील सदस्यांना टायगर ग्रुपने मदतीचा हात पुढे केला आहे.

टायगर ग्रुपमधील एका सदस्याचा वाढदिवस होते. वाढदिवसानिमित्त कसलाही डामडौल न करता खर्चाला फाटा देत बीड शहरातील तब्बल 501 कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे.

यापूर्वी देखील याच ग्रुपने पश्चिम महाराष्ट्रातील अतिवृष्टीत अडकलेल्या कुटुंबांना पूर ओसरेपर्यंत दोन वेळेचा भोजन देण्याचा सामाजिक उपक्रम राबविला होता.

सामाजिक उपक्रम आणि गरजूंच्या मदतीसाठी धावून येणारा ग्रुप म्हणून टायगर ग्रुपकडे पाहिले जाते.

या ग्रुपकडून संपूर्ण राज्यातील गरजूंना नेहमीच मदत करण्यात येते. विशेष म्हणजे हा ग्रुप कुठल्याही राजकीय संघटनेशी निगडित नाही.