
जया बच्चन या नेहमीच चर्चेत असतात. जया बच्चन यांनी एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. नुकताच जया बच्चन यांनी मोठा खुलासा केला. अमिताभ बच्चन यांच्या वाईट काळात त्या कशा पद्धतीने त्यांच्यासोबत होत्या, हे त्यांनी सांगितले.

जया बच्चन यांनी नुकताच एक मोठी तक्रार केलीये. जया बच्चन यांनी त्यांच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट केली. मात्र, असे असताना देखील त्यांना हवी तशी ओळख ही अजिबातच मिळाली नाहीये.

जया बच्चन म्हणाल्या की, एखाद्या कलाकाराला जर त्याच्या कामानुसार ओळख मिळाली नसेल तर ते वाईट आहे. ज्यापद्धतीने काम केले, त्यानुसार कधीच क्रेडिट मिळाले नाही.

त्यानंतर आपण विचार करतो की, कदाचित ते आपल्या नशिबातच नाही. मी असे नाही म्हणून शकत की, मला फरक पडत नाही. वाईट नक्कीच वाटते. पहिल्यांदाच जाहिरपणे बोलताना जया बच्चन या दिसल्या.

जया बच्चन या फक्त अभिनयच नाही तर गेल्या काही वर्षांपासून राजकारणात देखील चांगल्याच सक्रिय दिसत आहेत. जया बच्चन या बिनधास्त बोलताना दिसतात.