अनोखा ‘दशरथ मांझी’; ६७ वर्षांच्या नानांनी एकट्याने डोंगर फोडून बनवला रस्ता

कोणतेही काम करताना कामाला सुरुवात करणे महत्वाचे असणे, कारण कारण कामाचे स्वरुप पाहून आधीच हातपाय गळाले तर कोणतेही काम पूर्ण होत नाही. अशीच जिद्द सातारा येथील अनोख्या अशोक तुकाराम जाधव उर्फ नाना यांनी दाखवली. डोंगर पोखरुन त्यांना गावासाठी रस्ता तयार केला आहे. 'मांझी: द माऊंटन मॅन' चित्रपटातील दशरथ मांझी यांची कथा आपण पडद्यावर पाहिली असेल पण तशीच अचाट इच्छाशक्ती नानांनी दाखवली आहे.

| Updated on: Apr 30, 2026 | 6:21 PM
1 / 5
प्रयत्ने वाळुचे कण रगडीता तेलही गळे...असे उगाच म्हटले जात नाही.माणसाची जिद्द असेल तर कोणतेही अवघड शिवधनुष्य पेलता येते. याचा प्रत्यय साताऱ्यात आला आहे. येथील करंडी गावचे ६७ वर्षी अशोक जाधव उर्फ नाना यांनी अचाट कामगिरी केली आहे.

प्रयत्ने वाळुचे कण रगडीता तेलही गळे...असे उगाच म्हटले जात नाही.माणसाची जिद्द असेल तर कोणतेही अवघड शिवधनुष्य पेलता येते. याचा प्रत्यय साताऱ्यात आला आहे. येथील करंडी गावचे ६७ वर्षी अशोक जाधव उर्फ नाना यांनी अचाट कामगिरी केली आहे.

2 / 5

अशोक जाधव उर्फ नाना यांनी येथील श्री सिलोबा गडावरील खडतर वाट त्यांनी आपल्या श्रमातून ३.५ किलोमीटरच्या सुटसुटीत रस्त्यात रूपांतरित केली आहे. या गावातील या डोंगरावरील मंदिरातील वाट आधी अवघड होती.

3 / 5

श्री सिलोबा गड हे या भागातील महत्त्वाचे श्रद्धास्थान मात्र गडावर जाण्यासाठी पूर्वी अत्यंत अरुंद घसरडी आणि जीवघेणी पायवाट होती. वयोवृद्ध, महिला भाविकांना तिथे जाणे अशक्य व्हायचे.

4 / 5

ही अडचण पाहून अशोक जाधव यांनी कुणाचीही मदत न घेता हा रस्ता तयार करण्याचा ध्यास घेतला.सुरुवातीला गावातील मुलेही त्यांना मदत करायची.नंतर त्यांनी नेमाने रोज येथील गवत काढले आणि तीन चार फुटांचा रस्ताही तयार केला.

5 / 5

अशोक जाधव स्वत:सोबत पाणी न्यायचे आणि पाणी संपेपर्यंत काम करायचे आणि पाणी संपले की घरी यायचे. अशा प्रकारे चार वर्षांच्या मेहनतीनंतर हा रस्ता आता पूर्ण झाला आहे.यंदाच्या जत्रेला या वाटेमुळे महिलाही देवाच्या दर्शनाला आल्या होत्या. त्यामुळे अशोक जाधव यांचे गावातील ग्रामस्थांसह परिसरात चांगलेच कौतुक आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us