
भारत झपाट्याने तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. भारत डिजिटलीकरणाकडे वेगाने झेपावत आहे. पण त्यासोबतच सायबर गुन्हेगारी पण वाढत आहे. डिजिटल इंडियावर सायबर भामटे आक्रमण, हल्ले करत आहे. गेल्यावर्षीप्रमाणेच या वर्षात पण सायबर गुन्हे वाढले आहे.

जागतिक सायबर सुरक्षा कंपनी Kaspersky नुसार, यावर्षी भारतात सायबर हल्ल्याचे प्रमाण सुरुच आहे. या सायबर हल्ल्यात सर्वाधिक रॅनसमवेअरचा वापर होत आहे. भारतात इंटरनेट युझर्सची संख्या मोठी आहे. सायबर भामट्यांसाठी डिजिटल इंडिया लोकप्रिय ठिकाण ठरत आहे. सायबर भामटे सर्वसामान्यांना लक्ष्य करुन त्यांचा कष्टाचा पैसा लुबाडत आहेत.

2023 मध्ये 2 लाखांहून अधिक रॅनसमवेअरची प्रकरणं समोर आली. . Fonix आणि LockBit सारख्य रॅनसमवेअर समूहाने जगभरात धुमाकूळ घातला. भारतातील मॅन्युफॅक्चरिंग, रिटेल, कृषी, मीडिया आणि आरोग्य क्षेत्राला या हँकर्सने लक्ष्य केले. Fonix आता पण RaaS मेलवेअरच्या आधारे हल्ला करते.

सायबर हल्ल्यासाठी जगातील टॉप 12 देशांमध्ये भारताचा पण समावेश आहे. देशात LockBit ने मोठ-मोठ्या संघटनांच्या विंडोज सिस्टिममध्ये सुरंग लावले. पहिल्या रॅनसमवेअरने पहिल्यांद Apple सिस्टिममध्ये सुरुंग लावला होता.

भारताच्या आयटी सिस्टिमला रॅनसमवेअरपासून वाचविण्यासाठी लगेचच सायबर सुरक्षा प्रणालीचा अंगिकार करणे अत्यंत गरजेचे आहे. थ्रेट इंटेलिजेन्स कॅपेबिलिटीजच्या सहायाने या हल्ल्याने लगाम घालण्यास मदत मिळू शकते. त्यासाठी सायबर सुरक्षा उत्पादन आणि सेवांची मदत घेता येऊ शकते.