
सापांबाबत अनेक गैरसमज आहेत. जसे की तो बदला घेतो. प्रत्येक साप हा विषारीच असतो. अशा अनेक गैरसमजांमुळे आपण अनेकदा आपल्या परिसरात साप दिसला की त्याला मारतो. यामुळे सापांच्या अनेक दुर्मिळ प्रजाती नष्ट होत आहेत. आपल्याला कुठेही साप आढळल्यास त्याची माहिती ही सर्पमित्रांना देणं आवश्यक आहे.

महाराष्ट्रामध्ये जे साप आढळून येतात त्यामधील फक्त चारच जाती या विषारी आहेत, ज्यामध्ये घोणस, फुरसे, मण्यार आणि नाग यांचा समावेश होतो. आज आपण अशा पाच वृक्षांची माहिती घेणार आहोत. जी वृक्ष घरात असतील तर त्या परिसरात सापांचा वावर असण्याची शक्यता असते.

तुळस - तुळशीला हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान आहेत. तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. मात्र तुळशीला असलेल्या विशिष्ट गंधामुळे आणि पानांच्या संरचनेमुळे साप या झाडाकडे आकर्षित होतात. त्यामुळे तुळस बाहेर न लावता घरातच लावणं सुरक्षित मानलं जातं

चाफ्याचं झाड - चाफ्याचं फूल हे त्याच्या सुगंधासाठी ओळखलं जातं. मात्र चाफ्याच्या झाडाच्या फांद्या आणि पान हे सापांना लपण्यासाठी एक सुरक्षित अश्रयस्थान असतं. त्यामुळे चाफ्याचं झाडं हे तुमच्या घराच्या परिसरात किंवा घरासमोर न लावण्याचा सल्ला दिला जातो.

लिंबांचं झाडं - जर तुमच्या घरातही लिंबुनी असेल तर वेळीच सावध व्हा कारण लिंबांचा वास देखील सापांना आकर्षित करतो. लिंबांचं झाडं हे इतर वृक्षाच्या तुलनेत अधिक डेरदार असतं.त्यावर साप सहज लपू शकतात. ते सहजासहजी दिसत देखील नाहीत. त्यामुळे तुमच्याही घरी जर हे झाड असेल त्याची नियमित छाटणी करण्याचा सल्ला दिला जातो.

गोकर्णीचा वेल - गोकर्णीच्या वेलाला निळे फुलं येतात, ही फुले सापांना आकर्षीत करतात. तसेच या वेलाला दाट पानं असल्यामुळे साप या वेलाच्या पानात आश्रय घेतात. त्यामुळे अशा वेलाजवळ जाताना काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो.

लँटाना वनस्पती - लँटानाच्या झाडाला जे फुलं येतात ते अधिक रंगीत आणि चमक असलेले असतात. या फुलांची चमक ही सापांना आकर्षित करते. या झाडाला दाट आणि छोटी-छोटी पानं असतात. त्यामुळे या झाडांमध्ये साप सहज लपू शकतो.त्यामुळे अनेकदा अशी झाडं सापांचे आश्रय स्थान असतात. (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)