Shahu Maharaj : राहुल गांधींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना खासदार शाहू महाराजांचं उत्तर, काँग्रेसने तर..
Shahu Maharaj : कॉकरोच जनता पार्टीच्या या आंदोलनावरुन देशात मोठा गदारोळ सुरु आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागात आंदोलनं सुरु आहेत. नीट पेपर फुटीवरुन हे आंदोलन सुरु झालं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही आंदोलनकर्त्यांची मुख्य मागणी आहे.

कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज यांनी आज दिल्लीत जंतर-मंतरवर येऊन सीजेपीच्या आंदोलन स्थळाला भेट दिली. यावेळी शाहू महाराजांनी आपले विचार मांडले. “गेल्या काही वर्षातला कारभार आपण बघितला विद्यार्थ्यांवर सातत्याने अन्याय होतोय. आता तो ठराविक पॉइंटला येऊन पोहोचलाय. कुठल्याही अन्यायाविरोधात आपण आहोत. लढत राहिलं पाहिजे, ज्यांच्यावर अन्याय होतोय त्यांना पाठिंबा दिला पाहिजे” असं खासदार शाहू महाराज म्हणाले. मुंबईत सीजेपीचं समर्थन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलीस ताब्यात घेत आहेत. त्यावर शाहू महाराजांना विचारलं असता ते म्हणाले की, ‘त्यातून विद्यार्थ्यांच्या मनात किती रोष आहे ते आपल्या लक्षात येतं’
राहुल गांधी, काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातय. त्यावर शाहू महाराज म्हणाले की, “विद्यार्थ्यांना काँग्रेसने पाठिंबा दिला आहे. त्यांनी मागणी सुद्धा केलीय की, मंत्रिमहोदयानी राजीनामा द्यावा” धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे, त्यावर शाहू महाराज म्हणाले की, ‘त्यांनी राजीनामा दिला तर सगळ्या गोष्टी सोप्या होतील’
सरकार आणि सीजेपीच्या नेत्यांमध्ये चर्चा होणार
कॉकरोच जनता पार्टीच्या या आंदोलनावरुन देशात मोठा गदारोळ सुरु आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागात आंदोलनं सुरु आहेत. नीट पेपर फुटीवरुन हे आंदोलन सुरु झालं आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही आंदोलनकर्त्यांची मुख्य मागणी आहे. आज दुपारी दिल्लीतील नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियामध्ये सरकार आणि सीजेपीच्या नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. या बैठकीतून तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे.
बैठक निष्फळ ठरण्याची शक्यताच जास्त
कारण या आंदोलनादरम्यान मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला आहे. पोलीस आणि विद्यार्थी दोघे जखमी झाले आहेत. सीजेपीने सरकारसोबत होणाऱ्या बैठकीआधी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामाच हवा, त्यापेक्षा कमी काही नको अशी सीजेपीची भूमिका आहे. त्यामुळे ही बैठक निष्फळ ठरण्याची शक्यताच जास्त आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार या नेत्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलन स्थळाला भेट दिली आहे.
