हिवाळ्यात पाण्याकडे अजिबात नका करू दुर्लक्ष, गंभीर आजारांवरही असा आहे फायदा

| Updated on: Nov 02, 2020 | 8:45 PM

शरीरात जर पाण्याची पातळी डगमगली तर मात्र भयंकर आजारांचा सामना करावा लागतो.

1 / 8
पाणी आपल्या शरीराचा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. मानवी शरीरामध्ये तब्बल 70 टक्के पाणी असतं. जे पेशी, अवयव आणि शरीरातील टिशूसोबत ऑक्सिजन पातळीला रेगुलेट करण्याचं काम करतं.

पाणी आपल्या शरीराचा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. मानवी शरीरामध्ये तब्बल 70 टक्के पाणी असतं. जे पेशी, अवयव आणि शरीरातील टिशूसोबत ऑक्सिजन पातळीला रेगुलेट करण्याचं काम करतं.

2 / 8
शरीरात जर पाण्याची पातळी डगमगली तर मात्र भयंकर आजारांचा सामना करावा लागतो.

शरीरात जर पाण्याची पातळी डगमगली तर मात्र भयंकर आजारांचा सामना करावा लागतो.

3 / 8
खरंतर आपण सगळे हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्यात जास्त पाणी पितो. पण हिवाळ्यामध्ये आपली रोगप्रतिकार शक्ती (Immune System) कमकुवत होते. म्हणूनच आपण बऱ्याचदा आजारी पडतो.

खरंतर आपण सगळे हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्यात जास्त पाणी पितो. पण हिवाळ्यामध्ये आपली रोगप्रतिकार शक्ती (Immune System) कमकुवत होते. म्हणूनच आपण बऱ्याचदा आजारी पडतो.

4 / 8
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, शरीरातलं पाण्याचं प्रमाण हे केवळ आपल्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी चांगलं नाही तर त्याचे इतरही अनेक फायदे आहेत. जाणून घेऊयात हिवाळ्यात पाणी पिण्याचे फायदे...

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, शरीरातलं पाण्याचं प्रमाण हे केवळ आपल्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी चांगलं नाही तर त्याचे इतरही अनेक फायदे आहेत. जाणून घेऊयात हिवाळ्यात पाणी पिण्याचे फायदे...

5 / 8
हिवाळ्यामध्ये कमी पाणी प्यायल्यामुळे तुमचं शरीर निर्जलीकरण होतं. यामुळे हायपोथर्मियासारख्या आजाराचा धोका वाढतो. शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यासाठी हिवाळ्यात भरपूर पाणी प्या.

हिवाळ्यामध्ये कमी पाणी प्यायल्यामुळे तुमचं शरीर निर्जलीकरण होतं. यामुळे हायपोथर्मियासारख्या आजाराचा धोका वाढतो. शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यासाठी हिवाळ्यात भरपूर पाणी प्या.

6 / 8
तंदुरुस्त राहण्यासाठी अति पाण्याचे सेवन ठरु शकते घातक

तंदुरुस्त राहण्यासाठी अति पाण्याचे सेवन ठरु शकते घातक

7 / 8
योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यामुळे लघवी आणि घामाद्वारे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होते. यामुळे मूत्रपिंड, यकृत आणि हृदयाची स्थिती उत्तम राहते.

योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यामुळे लघवी आणि घामाद्वारे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत होते. यामुळे मूत्रपिंड, यकृत आणि हृदयाची स्थिती उत्तम राहते.

8 / 8
पाण्यातील औषधी गुणधर्म आपल्या त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात. शरीरात पाण्याचं प्रमाण पुरेसे असेल तर त्वचा चमकदार होते.

पाण्यातील औषधी गुणधर्म आपल्या त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात. शरीरात पाण्याचं प्रमाण पुरेसे असेल तर त्वचा चमकदार होते.