
महाराष्ट्रतील शिवसेना नेते एकनाथ शिंदे नॉट रिचेबला आल्यापासून महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीना वेग आला आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आणणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे कसे घडले

महाबळेश्वर तालुक्यातील दरे हे एकनाथ शिंदे यांचं गाव. घराची गरीबी असल्याने शिक्षणासाठी ते ठाण्याला आले . गरीबीमुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावं लागलं . कुटुंबाला हातभार लावण्यासाठी एका मासळी विकणाऱ्या कंपनीत सुपरवाझर म्हणून काम केलं. मात्र त्यानातूनही मिळणारे उत्पन्न कमी असल्याने त्यांनी शिंदे यांनी रिक्षा चालवण्यास सुरुवात केली.

रिक्षा चालक म्हणून काम करत असतानाच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाण्यातील शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांच्या संपर्कात आले. तेव्हा त्यांचं वय होतं 18 वर्ष. वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी त्यांनी शिवसेनेतून राजकीय श्रीगणेशा केला.

शिवसेनेत काम कारु लागल्यापासून एकनाथ शिंदे अनेक आंदोलनात सहभागी झाले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा आंदोलनात त्यांनी पोलिसांचा लाठीमारही खाल्या आहेत.

1997मध्ये त्यांना आनंद दिघेंनी ठाणे महापालिका निवडणुकीचं तिकीट दिलं. या निवडणुकीत शिंदे घवघवीत मतांनी विजयी झाले. त्यानंतर ते ठाणे महापालिकेचे सभागृह नेतेही झाले. सभागृह नेते म्हणून पालिका गाजवल्यानंतर 2004मध्ये त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली.

पहिल्याच विधानसभा निवडणुकीत ते निवडून आले. 2004 पासून सलग चार वेळा ते कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून आमदारपदी निवडून आलेले आहेत. त्यानंतर 2014मध्ये शिवसेना विरोधी पक्षात बसणार होती. तेव्हा 12 दिवसांसाठी ते गटनेते झाले होते. त्यानंतर शिवसेना सत्तेत गेल्यानंतर ते मंत्रीही झाले. 2019मध्ये ते कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले. सध्या ते ठाकरे सरकारमध्ये नगरविकास मंत्री आहेत.

पहिल्याच विधानसभा निवडणुकीत ते निवडून आले. 2004 पासून सलग चार वेळा ते कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून आमदारपदी निवडून आलेले आहेत. त्यानंतर 2014मध्ये शिवसेना विरोधी पक्षात बसणार होती. तेव्हा 12 दिवसांसाठी ते गटनेते झाले होते. त्यानंतर शिवसेना सत्तेत गेल्यानंतर ते मंत्रीही झाले. 2019मध्ये ते कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले. सध्या ते ठाकरे सरकारमध्ये नगरविकास मंत्री आहेत.