IND vs PAK: पाकिस्तानचा खेळ अतिशय वाईट तरीही खेळणार फायनल, भारत-पाक पुन्हा आमने सामने, असं कसं?

IND vs PAK Match: नुकताच भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाचा विजय झाला. आता भारत आणि पाकिस्तान हे पुन्हा आमने सामने येणार आहे.

| Updated on: Sep 07, 2026 | 2:03 PM
1 / 5
महिला टी२० आशिया कप २०२६ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा सामना होऊ शकतो. दोन्ही देशांचे महिला संघ पुन्हा एकदा एकमेकांसमोर येऊ शकतात. महिला टी२० आशिया कप २०२६ मध्ये भारत आणि पाकिस्तान पहिल्यांदा ५ सप्टेंबर रोजी आमनेसामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाने बाजी मारली.

महिला टी२० आशिया कप २०२६ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा एकदा सामना होऊ शकतो. दोन्ही देशांचे महिला संघ पुन्हा एकदा एकमेकांसमोर येऊ शकतात. महिला टी२० आशिया कप २०२६ मध्ये भारत आणि पाकिस्तान पहिल्यांदा ५ सप्टेंबर रोजी आमनेसामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाने बाजी मारली.

2 / 5

महिला टी२० आशिया कपमधील पाकिस्तानचा पुढचा सामना हाँगकाँगविरुद्ध आहे. भारताकडून दारुण पराभव पत्करलेल्या पाकिस्तानी संघाने जर हा सामना जिंकला, तर तो महिला टी२० आशिया कप २०२६ च्या उपांत्य फेरीत प्रवेश करेल. भारतीय संघाने गट फेरीतील आपले तिन्ही सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

3 / 5

आता प्रश्न असा आहे की, उपांत्य फेरीत भारत आणि पाकिस्तान एकमेकांसमोर येतील का? तर तसं शक्य नाही. या दोन संघांना अंतिम फेरीत पोहोचण्याची वाट पाहावी लागेल. जर पाकिस्तानने हाँगकाँगला हरवून उपांत्य फेरी गाठली, तर त्यांचा सामना श्रीलंकेशी होईल.

4 / 5

भारतीय महिला संघ ८ सप्टेंबर रोजी बांगलादेश आणि युएई यांच्यातील सामन्याच्या विजेत्याशी सामना करेल. भारतीय संघ १० सप्टेंबर रोजी महिला टी२० आशिया चषकाचा पहिला उपांत्य सामना खेळेल. जर पाकिस्तानने हाँगकाँगला हरवले, तर ते ११ सप्टेंबर रोजी होणाऱ्या दुसऱ्या उपांत्य फेरीत प्रवेश करतील.

5 / 5

जर भारत आणि पाकिस्तानने आपापले उपांत्य सामने जिंकले, तर महिला टी२० आशिया चषकाचा अंतिम सामना १३ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाऊ शकतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us