
सावंत यांनी वेधले कोल्हापूरकरांचे लक्ष: शेतकरी असलेले राहुल सावंत यांनी शहरातील तावडे हॉटेल परिसरात हा द्राक्ष विक्रीचा स्टॉल उभारला आहे. त्यामुळे थेट ग्राहकांना तर लाभ होत आहे. पण फॉर्च्यूनर मधून द्राक्ष विक्री हा कोल्हापूरकरांसाठी आकर्षणाचा विषय बनला आहे. द्राक्ष खरेदीसाठी अनेकांची गर्दी होत आहे.

हे सर्व कशासाठी? शेती कष्ट करुन शेतीमाल उत्पादीत करतो मात्र, योग्य दर मिळत नसल्यामुळेच त्याच्या पदरी निराशा पडत आहे. त्यामुळे आपला शेती दलालांच्या हाती न देता स्वत: विकला तर त्याचा अधिकचा फायदा आहे. त्यामुळेच शेतकरी राहुल सावंत यांनी फॉर्च्यूनर गाडीमध्येच द्राक्षांचा स्टॉल लावला असून थेट ग्राहकांना विक्री केली जात आहे.

शेतकरी ते ग्राहक ही संकल्पना: शेतकरी ते ग्राहक यांच्यामध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. त्याचा फायदा हे मध्यस्ती असलेले दलाल घेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आणि पर्यायाने ग्राहकांचेही नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकरी ते ग्राहक थेट संवाद होण्याच्या दृष्टीने हे पाऊल सावंत यांनी उचलले आहे.

शेतीमालाची थेट ग्राहकांना विक्री व्हावी म्हणून शेतकऱ्याने चक्क फॉर्च्यूनर गाडीमध्येच स्टॉल उभारला आहे.

शेतकरी समृध्द तर सर्वकाही: शेतकरी समृध्द झाला तर सर्वकाही साध्य होणार आहे. त्यामुळे आज फॉर्च्यूनर मधून जरी द्राक्षे विकली जात असली तरी उद्या हाच शेतकरी बीएमडब्ल्यू मधूनही द्राक्ष विकू शकतो. एवढा बळीराजा प्रगत व्हावा ही त्यांची भावना आहे.