
तुमच्या रोजच्या जेवणात असेलंल मीठ तुमची गरिबी दूर करू शकतं असं वास्तूशास्त्र सांगतं.

ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार रात्री झोपताना उशीखाली तुम्ही मीठ ठेवलं तर तुमच्या आयुष्यात अनेक महत्त्वाचे बदल होऊ शकतात. यामुळे फक्त मानसिक सांतीच नव्हे तरे वाईट शक्तींपासूनही सुटका मिळवता येऊ शकते, असे सांगितले जाते.

रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही मिठाची पिशवी उशीखाली ठेवली तर तुमच्या आजूबाजूची नकारात्मक उर्जा हळूहळू कमी होते. जे लोक झोपेत घाबरतात तसेच ज्यांना भीतीदायक स्वप्न पडतात त्यांनी हा उपाय करून पाहायला हवा.

तुम्ही सतत आजारी पडत असाल तसेच कोणतेही खास कारण नसताना तुमचे एखादे काम होत नसेल तर उशाला मिठाची पिशवी ठेवायला हवे. यामुळे वाईट नजरेपासून तुमचे संरक्षण होऊ शकते.

झोपताना उशाला मीठ ठेवल्यास तुमच्या आयुष्यात मोठी धन-संपत्ती येण्याची शक्यता असते. त्यासाठी झोपण्यापूर्वी मिठाची पिशवी हातात घेऊन ‘ॐ धनाय नमः’ या मंत्राचा 11 वेळा जप करावा. त्यानंतर ही मिठाची पिशवी उशीखाली ठेवावी. असे केल्यास तुमच्या आयुष्यात धन-संपत्ती येण्याची शक्यता असते.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.