
ऋषि कपूर आणि नीतू कपूर यांची प्रेम कहानी ही फार जास्त खास आणि वेगळी आहे. एका चित्रपटाच्या शूटिंगवेळी पहिल्यांदा नीतू कपूर आणि ऋषि कपूर यांची भेट झाली. त्यानंतर त्यांची खरी ओळख ही जहरीला इंसानच्या सेटवर झाली.

नीतू कपूर यांना सुरूवातीला अजिबातच ऋषि कपूर आवडले नाहीत. नीतू कपूर या त्यावेळी फक्त 15 वर्षांच्या होत्या. ऋषि कपूर हे छोट्या छोट्या गोष्टींसाठी नीतू कपूर यांना सुनावत असत.

काही काळानंतर यांच्यामध्ये खास मैत्री निर्माण झाली. मात्र, त्यावेळी ऋषि कपूर हे यास्मीन मेहता नावाच्या मुलीवर प्रेम करायचे. इतकेच नाही तर ज्यावेळी यास्मीन मेहता हिच्यासोबत त्यांचे वाद व्हायचे.

त्यावेळी नीतू कपूर यांच्याकडून ते प्रेम पत्र लिहून घ्यायचे. मात्र, यास्मीन मेहता आणि ऋषि कपूर यांचे रिलेशन फार काळ टिकू शकले नाही आणि त्यांचे ब्रेकअप झाले. त्यानंतर नीतू कपूर यांच्या प्रेमात ऋषि कपूर हे पडले.

22 जानेवारी 1980 मध्ये नीतू कपूर आणि ऋषि कपूर यांनी लग्न केले. ऋषि कपूर यांच्यासोबत लग्न केल्यानंतर नीतू कपूर हा अभिनयापासून दूर गेल्या. ऋषि कपूर आणि नीतू यांची लव्ह स्टोरी खास होती.