लता मंगेशकरांचं हे गाणं ऐकताना आजही अंगावर येतो काटा, 64 वर्षांपासून सर्वांचं आवडतं
भारतीय संगीतविश्वातील 'स्वरकोकिळा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लता मंगेशकर यांचं 64 वर्षांपूर्वीचं गाणं ऐकलं तरी अंगावर येतात काटे. आजही लोक आवडीने ऐकतात हे गाणं.

भारतरत्न लता मंगेशकर यांना भारतीय संगीतविश्वातील 'स्वरकोकिळा' म्हणून ओळखले जाते. आपल्या मधुर आवाजाने अनेक दशकं रसिकांच्या मनावर त्यांनी अधिराज्य गाजवलं.

1962 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बीस साल बाद' या चित्रपटासाठी त्यांनी गायलेले 'कहीं दीप जले कहीं दिल' हे गाणं प्रदर्शित होताच प्रचंड लोकप्रिय झाले आणि आजही हिंदी चित्रपटसंगीतातील सर्वोत्कृष्ट रहस्यमय आणि भावपूर्ण गीतांपैकी एक मानले जाते.

चित्रपटातील या गाण्याचा वापर इतका प्रभावी होता की ते पडद्यावर किंवा दूरदर्शनवर लागले की प्रेक्षकांच्या अंगावर अक्षरशः शहारे यायचे. आजही हे गाणे हिंदी चित्रपटसंगीताच्या सुवर्णकाळातील एक अजरामर कलाकृती मानले जाते.

या गाण्यासाठी लता मंगेशकर यांना 1963 च्या Filmfare Awards मध्ये सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा पुरस्कार मिळाला. त्याचबरोबर शकील बदायुनी यांना सर्वोत्तम गीतकाराचा पुरस्कार मिळाला होता.

हा लता मंगेशकर यांच्या कारकिर्दीतील दुसरा फिल्मफेअर पुरस्कार होता. यापूर्वी त्यांना 1959 मध्ये 'मधुमती' मधील 'आजा रे परदेसी' या गाण्यासाठी सन्मानित करण्यात आले होते.