
खरीप हंगामात जिल्ह्यात यावर्षी सोयाबीन, मुंग, उडीद चवळी, तूर यासारख्या कडधान्याच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल होता, मात्र फुल धारणा आणि फळ धारणा च्या वेळेस पावसाने पाठ फिरवल्याने सोयाबीन आणि इतर पिकांचे उत्पादन येणार नसल्याची स्थिती आहे.

एकीकडे निसर्गाचे अवकृपा तर दुसरीकडे विद्युत वितरण कंपनीचे सुलतानी संकट या दुहेरी संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला वाली कोण असा प्रश्न आता जिल्ह्यातील शेतकरी विचारू लागला आहे.

दुसरीकडे शहादा तालुक्यात कमी पाणीसाठा असला तरी अनियमित विद्युत पुरवठ्यामुळे पपई आणि केळीच्या बागाही उध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

नंदुरबार जिल्ह्यात गेल्या २८ दिवसापासून पाऊस नसल्याने सोयाबीन, मुंग, उडीद आणि इतर पिकांचे उत्पादन येणार नसल्याने पिकांवर रोटाव्हिटर फिरवून जनावरांना चारा देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

पीक जळत असल्याने शेतकरी आता या पिकांवर रोटाव्हिटर फिरवून गुरांना चारा देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आले आहे. टाकलेला उत्पादन खर्चही निघणार नसल्याने शेतकऱ्याने करावं तरी काय सत्ताधारी लक्ष देत नाहीत विरोधक त्यांना जाब विचारत नाही अशी परिस्थिती असल्याने आत्महत्या शिवाय दुसरा पर्याय नसल्याचा शेतकऱ्यांनी सांगितल आहे.