
उन्हाळ्यात त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी चेहरा धुणे आवश्यक आहे. आपण सर्वचजण सामान्य पाण्याने चेहरा धुवत असतो. मात्र, तुरटीच्या पाण्याने चेहरा धुणे अधिक फायदेशीर ठरते. चला जाणून घेऊयात तुरटीच्या पाण्याने चेहरा धुण्याचे फायदे.

चेहरा धुण्यासाठी तुरटीपासून बनवलेले पाणी वापरू शकता. ते बनवण्यासाठी एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यात तुरटी सुमारे 3 तास टाकून ठेवा. आता हे पाणी सामान्य पाण्यात मिसळून चेहरा धुवा.

तेलकट त्वचा अनेकांची असते. यामुळे उघड्या छिद्रांमध्ये घाण लवकर जमा होते. असे लोक अतिरिक्त तेल काढण्यासाठी तुरटीची मदत घेऊ शकतात.

दिवसातून एकदा तरी तुरटीच्या पाण्याने चेहरा धुवावा. यामुळे आपल्या चेहरा तजेलदार होण्यासोबतच मुलायमदार होण्यास देखील मदत होते.

त्वचेवरील पिगमेंटेशन संपूर्ण लुक खराब करू शकते. तुरटीमध्ये असलेले व्हिटॅमिन सी पिगमेंटेशन बर्याच प्रमाणात कमी करू शकते.

रोज सकाळी उठल्यानंतर तुरटीच्या पाण्याने चेहरा धुतल्यानंतर चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या दूर होण्यास मदत होते. मात्र, तीन तास तरी पाण्यामध्ये तुरटी ठेवा.

केवळ तीव्र सूर्यप्रकाशच नाही तर हंगामात उपस्थित असलेल्या उष्णतेमुळे देखील त्वचेवर टॅनिंग होऊ शकते. चेहऱ्यावर टॅन झाल्यास चेहरा खराब दिसू लागतो.

टॅनिंग दूर करायचं असेल तर तुरटीच्या पाण्याची मदत घेऊ शकता. तुरटीच्या पाण्यात कापूस भिजवून चेहऱ्यावर टॅप करा आणि काही वेळ ठेवल्यानंतर सामान्य पाण्याने चेहरा धुवा.

बऱ्याच वेळा या हंगामामध्ये उन्हातून घरी आल्यावर त्वचेवर जळजळ होण्याची समस्या निर्माण होते. मग अशावेळी आपण तुरटीच्या पाण्याने चेहरा धुवायला हवा.

उन्हाळ्याच्या हंगामात त्वचा लाल पडण्याची समस्या मोठ्या प्रमाणात वाढते. मग अशावेळी आपण तुरटीच्या पाण्याने आपला चेहरा धुवावा. (वरीट टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)