संपूर्ण जगावर महात्सुनामीचं संकट, संशोधकांच्या दाव्याने जगाची चिंता वाढली!

अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी संपूर्ण जगाला सतर्क करणारा दावा केला आहे. लवकरच समुद्रातून एक हजार फूट उंच लाटा निर्माण होऊ शकतात. या लाटा म्हणजे महात्सुनामीच असेल, असं संशोधकांनी म्हटलंय.

| Updated on: Aug 14, 2025 | 9:04 PM
1 / 5
अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी संपूर्ण जगाला सतर्क करणारा दावा केला आहे. लवकरच समुद्रातून एक हजार फूट उंच लाटा निर्माण होऊ शकतात. या लाटा म्हणजे महात्सुनामीच असेल, असं संशोधकांनी म्हटलंय.

अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी संपूर्ण जगाला सतर्क करणारा दावा केला आहे. लवकरच समुद्रातून एक हजार फूट उंच लाटा निर्माण होऊ शकतात. या लाटा म्हणजे महात्सुनामीच असेल, असं संशोधकांनी म्हटलंय.

2 / 5
ही महात्सुनामी अमेरिकी प्रशांत महासागरातील किनाऱ्यावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. उत्तर कॅलिफोर्नियापासून व्हँकुव्हर बेटापर्यंत साधारण 600 मैलांपर्यंत या त्सुनामीचे केंद्र असू शकते, असे म्हटले जात आहे.

ही महात्सुनामी अमेरिकी प्रशांत महासागरातील किनाऱ्यावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. उत्तर कॅलिफोर्नियापासून व्हँकुव्हर बेटापर्यंत साधारण 600 मैलांपर्यंत या त्सुनामीचे केंद्र असू शकते, असे म्हटले जात आहे.

3 / 5
शास्त्रज्ञ टीना दुरा यांच्या टीमने व्हर्जिनिया टेकच्या संशोधकांनी हा दावा केला आहे.  या दाव्यानुसार आगामी 50 वर्षांमध्ये कॅस्केडिया सबडक्शन झोनमध्ये (CSZ) साधारण 8.0 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप होईल. ज्यामुळे ही त्सुनामी येऊ शकते.

शास्त्रज्ञ टीना दुरा यांच्या टीमने व्हर्जिनिया टेकच्या संशोधकांनी हा दावा केला आहे. या दाव्यानुसार आगामी 50 वर्षांमध्ये कॅस्केडिया सबडक्शन झोनमध्ये (CSZ) साधारण 8.0 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप होईल. ज्यामुळे ही त्सुनामी येऊ शकते.

4 / 5
टीना दुरा यांच्या टीमने कॅस्केडिया सबडक्शन झोनच्या संबंधात पूर आणि पुरामुळे निर्माण होणार धोका तसेच समुद्रच्या पाणीपातळीत सातत्याने होणारी वाढ यावरही अभ्यास केला. या अभ्यासातून त्सुनामी येऊ शकते, असा अंदाज या शंशोधकांनी व्यक्त केला आहे.

टीना दुरा यांच्या टीमने कॅस्केडिया सबडक्शन झोनच्या संबंधात पूर आणि पुरामुळे निर्माण होणार धोका तसेच समुद्रच्या पाणीपातळीत सातत्याने होणारी वाढ यावरही अभ्यास केला. या अभ्यासातून त्सुनामी येऊ शकते, असा अंदाज या शंशोधकांनी व्यक्त केला आहे.

5 / 5
योग्य ती काळजी न घतेल्यास भूकंप आणि महात्सुनामीमुळे हजारो लोकांचा जीव जाऊ शकतो. तसेच इमारती आणि इतरही काही महत्त्वाच्या गोष्टींचा विध्वंस होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

योग्य ती काळजी न घतेल्यास भूकंप आणि महात्सुनामीमुळे हजारो लोकांचा जीव जाऊ शकतो. तसेच इमारती आणि इतरही काही महत्त्वाच्या गोष्टींचा विध्वंस होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us