सामान्यांना सर्वात मोठा धक्का, आता कारच्या किमतीत जबर वाढ; या कंपनीने तर जाहीरही केलं!
इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाचा भारताला खूपच फटका बसत आहे. भारतात इंधनाचा भाव वाढला आहे. आता वाहन उत्पादन क्षेत्रालाही याची झळ बसण्यास सुरुवात झाली आहे. वाहनाच्या किमती वाढण्याची दाट शक्यता आहे.

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाचा भारताला चांगलाच फटका बसत आहे. इंधनाचा भाव प्रचंड वाढतो आहे. दुसरीकडे नैसर्गिक वायूचाही भाव वाढला आहे. आता इतरही क्षेत्राला या युद्धाची झळ बसण्यास सुरुवात झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अमेरिका-इराण युद्धामुळे मारुती सुझुकी ही देशातील अग्रगण्य वाहननिर्मिती करणारी कंपनी आपल्या वेगवेगळ्या कारची किंमत वाढवणार आहे. या कंपनीच्या कारची किंमत साधारण 30 हजार रुपयांपर्यंत वाढू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

आम्ही आमच्या कारच्या किमती वाढवणार आहोत, असे या कंपनीने सांगितले आहे. उत्पादन खर्चात सातत्याने वाढ होत आहे, त्यामुळे आम्हाला हे पाऊल उचलावे लागत आहे, असे या कंपनीने सांगितले आहे. या कंपनीच्या प्रत्येक कार मॉडलची किंमत वेगवेगळी वाढवली जाणार आहे.

या कंपनीच्या व्हॅगनार, सेलेरिओ, स्विफ्ट या गाड्यांची मोठी मागणी असते. या कार मध्यमवर्गीय लोकांच्या आवडीच्या आहेत. त्यामुळे मारुती सुझुकी कंपनीच्या निर्णयानंतर मध्यमवर्गीयांनाच जास्त फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तुम्ही जेवढी महागडी कार खरेदी कराल, तेवढे जास्त अधिक पसैे तुम्हाला द्यावे लागू शकतात. या कंपनीची सर्वात स्वस्त कार घ्यायची असेल तर तुम्हाला अतिरिक्त पाच किंवा दहा हजार रुपये मोजावे लागू शकतात. या कंपनीच्या कारच्या नव्या किमीत येत्या जून महिन्याच्या सुरुवातीला जाहीर केल्या जातील.