AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आजोबा आणि आत्याकडून लढवय्या रोहित पवारांचं अभिनंदन, कर्जमाफीच्या जाचक अटी सरकारने मागे घेताच काय म्हणाले शरद पवार?

Sharad Pawar : 2019 च्या महात्मा फुले कर्जमाफीमध्ये जे शेतकरी होते त्यांनाही आता दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे. यावर शरद पवार यांनी भाष्य करताना रोहित पवारांचे कौतुक केले आहे.

आजोबा आणि आत्याकडून लढवय्या रोहित पवारांचं अभिनंदन, कर्जमाफीच्या जाचक अटी सरकारने मागे घेताच काय म्हणाले शरद पवार?
Sharad Pawar and Rohit PawarImage Credit source: Google
| Updated on: Jul 10, 2026 | 11:23 PM
Share

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. 2019 च्या महात्मा फुले कर्जमाफीमध्ये जे शेतकरी होते, त्यांना आपण 50 हजारांपर्यंत कर्जमाफी देऊ म्हटलं होतं, यामागे त्यांना कर्जफेडीसाठी प्रोत्साहन देण्याचा उद्देश होता परंतु आता त्यांना देखील दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळणार आहे, अशी घोषणा यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तीन वर्षांपैकी दोन वर्ष ज्यांनी पैसे भरले आहेत, ते सर्व शेतकरी आता या योजनेसाठी पात्र होतील असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. आता यावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाष्य केले आहे.

काय म्हणाले शरद पवार?

शरद पवार यांनी ट्विट करत म्हटले की, ‘सततच्या नैसर्गिक आपत्ती ,शेतमालाचे कोसळलेले दर या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने कर्जमाफी योजना जाहीर केली होती परंतु सदरील कर्जमाफी योजनेत शासनाने 2019 कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंतचा कमाल लाभ देण्याची घातलेली अट तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना सन 2025-26 ,2026-27 चे पिककर्ज भरण्याची घातलेली अट यामुळे लाखो शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित राहण्याचा धोका होता.

राज्यभरातील शेतकऱ्यांची भावना लक्षात घेत आज शासनाने दोन्ही जाचक अटी मागे घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला त्याबद्दल सरकारचे आभार या दोन्ही अटी मागे घेण्यासंदर्भात लढा उभारणाऱ्या सर्व शेतकरी संघटना त्यांचे नेते ,राजकिया पक्ष त्यांचे नेते तसेच यामध्ये प्रमुख भूमिका बजावणारे आ.रोहित पवार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन !

सुप्रिया सुळेंनी मानले सरकारचे आभार

सुप्रिया सुळे यांनी याबाबत ट्विट करत म्हटले की, शेतकरी हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे, परंतु मागील काही वर्षातील अतिवृष्टी दुष्काळ, शेतमालाचे पडलेले बाजारभाव, वाढती महागाई, खते, औषधे, बियाणे यांचा वाढता खर्च अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने विनाअट सरसकट कर्जमाफी करण्याची गरज असताना देखील शासनाने कर्जमाफी योजनेत जाचक अटी टाकल्या होत्या.

उशिरा का होईना सरकारने अखेर आज या जाचक अटी शर्ती काढण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल सरकारचे आभार. या जाचक अटी काढून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी आग्रही भूमिका मांडत आ.रोहित पवार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी पंढरपूर ,छत्रपती संभाजीनगर येथे मोठे आंदोलन उभारले. छत्रपती संभाजीनगर येथील आंदोलनात मी स्वतः उपस्थित होते. शेतकऱ्यांनी आणि सर्व शेतकरी संघटना ,राजकीय पक्षांनी एकजुटीने हा लढा लढला आणि जिंकला सुद्धा ,सर्वांचे अभिनंदन!

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल