शेतकरी
देशात 60 टक्के शेतकरी आहेत. मात्र, प्रत्येक राज्यातील आणि त्या राज्यातील प्रत्येक जिल्हा, तसेच प्रांतातील शेतकऱ्यांची स्थिती एक सारखी नाहीये. प्रत्येक शेतकऱ्याची परिस्थिती, त्याच्यासमोरील आव्हाने आणि समस्या वेगळ्या आहेत. कधी पावसाने दिलेली ओढ तर कधी पावसाने उडवून दिलेली दाणादाण... कधी ओला तर कधी सुका दुष्काळ यामुळे शेतकरी वर्गाचं नेहमी नुकसान होत असतं. अशावेळी सरकार शेतकऱ्यांसाठी भरीव योजना अंमलात आणते. शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यापासून ते त्यांच्या मालाला भाव देण्यापर्यंतची कामे सरकार करत असते. सध्या स्वामिनाथन आयोग लागू करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. या बजेटमध्ये या मागणीवर विचार होतो की नाही हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.
Read Moreशेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन…
दुष्काळसदृश परिस्थिती आणि पावसाच्या दडीमुळे उभी पिके करपलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. ज्या भागांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, त्या ठिकाणी प्रत्यक्ष शेतात जाऊन सर्वेक्षण करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: Sep 10, 2026
- 6:00 pm
Nagpur Orange Loss | संत्र्याचा सडाच पडला! नागपूरच्या बागांमध्ये मोठ्या प्रमाणात फळगळ; 20-25 दिवसांपासून पाऊस गायब, शेतकरी संकटात
विदर्भात दुष्काळसदृश परिस्थितीमुळे प्रसिद्ध नागपुरी संत्र्याच्या पिकाला मोठा फटका बसला आहे. अपुऱ्या पाऊस आणि वाढलेल्या तापमानामुळे संत्र्याची मोठ्या प्रमाणात फळगळ होत आहे. यामुळे संत्र्याचे उत्पादन घटण्याची भीती असून, मृग बहाराचेही नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: Sep 10, 2026
- 4:19 pm
Akola | पाऊस गायब अन् सोयाबीन उद्ध्वस्त! अकोल्यात शेतकऱ्याने 4 एकर शेतात सोडली गुरं; अकोल्यात बळीराजा हताश
अकोला जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. बारशी टाकळी तालुक्यातील उमरदरी येथील शेतकरी योगेश राठोड यांनी चार एकर सोयाबीनच्या शेतात गुरेढोरे सोडण्याचा टोकाचा निर्णय घेतला. अपुऱ्या पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याने आणि चाराटंचाईमुळे त्यांनी ही कृती केली, जी शेतकऱ्यांच्या हलाखीची परिस्थिती दर्शवते.
- Harshada Gaikwad
- Updated on: Sep 10, 2026
- 1:47 pm
Akola | अकोल्यात 40-45 दिवसांपासून पाऊस नाही; सोयाबीन पीक उद्ध्वस्त, शेतकरी हवालदिल
अकोला जिल्ह्यात गेल्या ४० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने सोयाबीनचे हिरवेगार पीक सुकू लागले आहे. दुबार पेरणी करूनही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, यामुळे बळीराजा अक्षरशः हवालदिल झाला आहे. येणारा बैलपोळा सण साजरा करायलाही पैसे नसल्याने काळा पोळा साजरा करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत.
- Harshada Gaikwad
- Updated on: Sep 9, 2026
- 1:13 pm
Farmers Issue | पावसाने दिली दडी अन् शेतकरी संकटात! विदर्भातील जवळपास 20 तालुक्यांत 20-22 दिवसांपासून पाऊसच नाही
विदर्भात गेल्या महिनाभरापासून पावसाचा खंड असल्याने खरीप पिकांना मोठा फटका बसला आहे. कापूस, सोयाबीन, तूर यांसह धान पिके धोक्यात आली असून, दुष्काळसदृश परिस्थितीमुळे उत्पादनात मोठी घट येण्याची भीती आहे. बुलढाणा, अकोला, अमरावतीसह २० तालुक्यांमध्ये गंभीर स्थिती असून, शेतकरी चिंतेत आहेत.
- Harshada Gaikwad
- Updated on: Sep 9, 2026
- 12:13 pm
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! मराठवाडा-उत्तर महाराष्ट्रात 35% कमी पाऊस; सरकारचा मोठा निर्णय
पाऊस न पडल्याने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या सर्वेक्षणाचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पीक-पाण्याचा आढावा घेण्यात आला. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात ३५% पाऊस कमी झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
- Harshada Gaikwad
- Updated on: Sep 9, 2026
- 8:42 am
Onion Price Hike | शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात 6600, तर लासलगावात दर किती?
कांद्याच्या दरात पुन्हा तेजी आल्याने लासलगाव आणि पिंपळगाव येथील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मागणीच्या तुलनेत आवक घटल्याने भाव वाढले आहेत. पिंपळगावात ६,६०० तर लासलगावात ५,००० रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर पोहोचले आहेत. शहरी ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार बफर स्टॉकमधून कांदा ३५ रुपये प्रति किलोने उपलब्ध करत आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: Sep 8, 2026
- 3:32 pm
Ambadas Danve: हा तर पाळलेला… गुणरत्न सदावर्तें यांच्यावर अंबादास दानवे यांची बोचरी टीका
Ambadas Danve on Gunaratna Sadavarte: गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर जहरी टीका केली. या वादात त्यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना ओढले. त्यानंतर आज सकाळी आमदार रोहित पवार यांनी आणि उद्धव सेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Sep 8, 2026
- 11:53 am
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
नांदेड जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून पावसाने ओढ दिल्याने सोयाबीन पिकांवर येलो मोझॅकचा गंभीर प्रादुर्भाव झाला आहे. पांढऱ्या माशीमुळे पसरणाऱ्या या रोगाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून, काढणीच्या वेळी शेंगा भरल्या नाहीत. कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची अपेक्षा आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: Sep 7, 2026
- 4:28 pm
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात
अमरावती जिल्ह्यात एक महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील सोयाबीन पीक धोक्यात आले आहे. सप्टेंबर महिना सोयाबीनसाठी महत्त्वाचा असताना पुरेसा पाऊस नसल्याने वाढ खुंटली आहे. अल निनोच्या प्रभावामुळे धरणांतील पाणीसाठा कमी झाला असून, शेतकऱ्यांनी लावलेल्या लाखोंच्या गुंतवणुकीवर पाणी फिरले आहे. रब्बी पिकेही घेण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
- Harshada Gaikwad
- Updated on: Sep 7, 2026
- 2:59 pm
PM Kisan: पीएम किसानच्या यादीत नाव, तरीही अडकू शकतो हप्ता, लागलीच करा हे तीन काम
PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेच्या 24 व्या हप्त्याची शेतकरी वाट पाहत आहेत. पण हा हप्ता अडकू शकतो. त्यासाठी हे तीन काम झटपट उरकून घ्या. नाहीतर तुमचा शेतकरी सन्मान निधी योजनेचा हप्ता अडकू शकतो.
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Sep 6, 2026
- 2:28 pm
El Nino Alert: पावसाळा सोडा, हिवाळा पण.. एल निनोच्या इफेक्टबद्दल चिंता वाढवणारी माहिती समोर
El Nino Alert: अल निनोने पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. जूनमध्ये मुहूर्त हुकवणारा पाऊस जुलैमध्ये मुसळधार कोसळला. पण त्याने ऑगस्टमध्ये मोठा ब्रेक घेतला. सप्टेंबरची सुरुवातही मोघाम राहिली. आता हिवाळ्याविषयी मोठं आक्रीत घडलं आहे. काय आहे मोठा दावा?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Sep 4, 2026
- 8:44 am