35 वर्षांपासून लग्नात वाजतं हे गाणं, दर्दभरी असूनही प्रचंड सुपरहिट, श्रीदेवीच्या मोरनी डान्सने वेधलेलं सर्वांचं लक्ष
स्वरकोकिला लता मंगेशकर यांनी आपल्या जवळपास आठ दशकांच्या प्रदीर्घ आणि सुवर्णमय कारकिर्दीत असंख्य अजरामर गाणी दिली. यातीलच एक सुपरहिट गाणे असे आहे, ज्याला रिलीज होऊन तब्बल ३५ वर्षे झाली आहेत; मात्र आजही रोडवेज बसपासून ते लग्नसमारंभांपर्यंत या गाण्याची लोकप्रियता कायम आहे. आपण बोलत आहोत १९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या अनिल कपूर आणि श्रीदेवी यांच्या ‘लम्हे’ चित्रपटातील प्रसिद्ध गाणे ‘मोरनी बागा मा बोले’ याबद्दल.

लता मंगेशकर यांच्या आवाजातील ‘मोरनी बागा मा बोले’ आजही रसिकांच्या मनावर राज्य करतंय. १९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘लम्हे’ चित्रपटातील हे गाणं आजही तितकंच लोकप्रिय आहे.
अनिल कपूर आणि श्रीदेवी यांच्या ‘लम्हे’मुळे हे लोकगीत देशभर पोहोचलं. लग्नसमारंभ आणि उत्सवांमध्ये आजही ‘मोरनी बागा मा बोले’चा जल्लोष पाहायला मिळतो.
या आनंदी वाटणाऱ्या गाण्यामागे विरहाची भावनिक कहाणी दडलेली आहे. या गाण्याची मुळे राजस्थानच्या शेकडो वर्षे जुन्या लोकसंस्कृतीत रुजलेली आहेत.
बंजारा समाजाच्या लोकपरंपरेशीही या गीताचा संबंध जोडला जातो. उदरनिर्वाहासाठी दूर गेलेल्या पुरुषांच्या प्रतीक्षेत महिला हे गीत गात असत, अशी लोकपरंपरा सांगते.
विरह, प्रतीक्षा आणि आपल्या प्रियजनांच्या परतीची आस या भावनांमधून या गीताचा जन्म झाला. मारवाडी लोकपरंपरेतील हे विरहगीत पुढे चित्रपटाच्या माध्यमातून अजरामर ठरलं.