
अभिनेत्री मृणाल ठाकूरने बॉलिवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत चांगलंच नाव कमावलंय. 'सीतारामम', 'नाना', 'जर्सी' यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने विशेष छाप सोडली. धुळ्याच्या मृणालने टेलिव्हिजनपासून करिअरची सुरुवात केली होती.

'कुमकुम भाग्य' या मालिकेत मृणालने काम केलं होतं. त्यानंतर तिने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. करिअरच्या सुरुवातीला मृणाल एका लेखकाच्या प्रेमात आकंठ बुडाली होती.

शरद चंद्र त्रिपाठी असं त्या लेखकाचं नाव असून या दोघांनी काही काळ एकमेकांना डेट केलं होतं. इतकंच नव्हे तर 'नच बलिए' या डान्स शोच्या सातव्या सिझनमध्ये दोघांनी भाग घेतला होता. या दोघांच्या लव्ह-स्टोरीने सर्वांचं लक्ष वेधलं होतं.

मृणाल आणि शरदचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. कारण या दोघांना त्यांच्या रिलेशनशिपसाठी कुटुंबीयांची परवानगी मिळत नव्हती. अखेर शो संपल्यानंतर त्यांची जोडीसुद्धा तुटली. दोघांना वेगवेगळा मार्ग स्वीकारला.

शरदनंतर मृणालचं नाव अभिनेता अरजित तनेजाशीही जोडलं गेलं. ती मूळची धुळ्याची असून जळगाव आणि मुंबईत तिचं शालेय शिक्षण पार पडलं. शिक्षणादरम्यान मालिकेची ऑफर आल्याने ती ग्रॅज्युएशन पूर्ण करू शकली नाही.