नाशिकमध्ये मृत्यू ओशाळला, चार निष्पाप मुलांचा दुर्दैवी मृत्यू, धरणात खोल पाण्यात गेल्याने…
परंतु आनंदाच्या भरात याच तरुणाईकडून फार मोठ्या चुका होताना दिसत आहेत. आनंदात खोल पाण्यात गेल्याने अनेक ठिकाणी मृत्यू झाल्याचे प्रकार समोर येत आहेत. नाशिकमध्ये तर धक्कादायक घटना घडली आहे. इथे एकाच वेळी तब्बल चार जणांचा मृत्यू झाला आहे.

आता पावसाळा सुरू झाला आहे. पावसाच्या सरी बरसल्याने नदी, नाले यांच्यात पाणी साचले असून ते वाहात आहेत. तळे, तलाव यांच्यातही पाणी साचले आहे. दरम्यान, एकीकडे उन्हापासून दिलासा मिळावा यासाठी तरुण मुलं, मुली याच पाण्यात जाऊन आनंद लुटत आहेत.

परंतु आनंदाच्या भरात याच तरुणाईकडून फार मोठ्या चुका होताना दिसत आहेत. आनंदात खोल पाण्यात गेल्याने अनेक ठिकाणी मृत्यू झाल्याचे प्रकार समोर येत आहेत. नाशिकमध्ये तर धक्कादायक घटना घडली आहे. इथे एकाच वेळी तब्बल चार जणांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार नाशिकमधील - गंगापूर धरणात बुडून चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये 3 मुलं आणि एका मुलीचा समावेश आहे. मृत मुलं आणि मुलगी गंगापूर धरणाच्या जवळ असलेल्या सावरगाव या गावातील रहिवासी आहेत.

हे चारही जण पाण्यात खेळत होते. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने या चौघांचाही बुडून मृत्यू झाला आहे. मयुरी पवन जाधव, गणेश सुरेश गोतरने, निखिल मच्छिन्द्र गौतरणे, साहिल मनोहर गोतराने अशी मयत मुलांची नावे आहेत.

एकाच वेळी चार जणांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. ही घटना समोर आल्यानंतर सावरगावात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोहायला जाताना जास्त खोल पाण्यात जाऊ नये, असे आवाहन केले जात आहे.