
भुसावळ येथे कृषी विभागाच्यावतीने रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवात विविध जातीच्या रानभाज्या शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणले आहे.

कुठलीही पेरणी न करता व कुठलेही औषधांची फवारणी न करता पावसाळ्यात रानभाज्या नैसर्गिकरित्या उत्पादित होतात.

त्यामुळे रानभाज्या या शरीरासाठी अत्यंत उपयोगी मानल्या जातात.

त्यामुळे रानभाज्यांचे महत्त्व व त्या बनवण्याची पद्धत याबाबत या महोत्सवात मार्गदर्शन देखील करण्यात आले आहे. तसेच महिलांसाठी रानभाज्या पाककलेचे देखील आयोजन करण्यात आले होते.

महाराष्ट्रात अशा पद्धतीचे महोत्सव सगळीकडं महोत्सव व्हायला हवेत अशी प्रतिक्रिया लोकांनी दिली