
मोदी सरकारविरोधात देशातील सर्व प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मोट बांधली आहे.

काही दिवसांआधी बंगळुरुमध्ये विरोधी पक्षातील नेत्यांची बैठक पार पडली.

मणिपूरमधील हिंसाचारावरून विरोधी पक्षांनी संसदेत आवाज उठवला. विरोधी पक्षातील खासदारांच्या गटानं मणिपूरमध्ये जात स्थानिकांचे प्रश्न जाणून घेतले.

त्यानंतर आज 'INDIA' च्या नेत्यांची आज संसद भवनात बैठक पार पडली. यात मणिपूरच्या हिंसाचारावर चर्चा झाली.

यात संसदेच्या अधिवेशनात मणिपूरच्या हिंसाचारावर चर्चा झालीच पाहिजे, यावर ठाम राहण्याबाबत चर्चा झाली.