
सलमान खान - विवेक ओबेरॉय एकमेकांचं कट्टर शत्रू आहेत. चाहत्यांना देखील दोघांमध्ये असलेले वाद माहिती आहेत. अभिनेत्री ऐश्वर्या राय हिच्यामुळे सलमान - विवेक यांच्यात वाद असल्याचे अनेकदा समोर आलं.

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांचं लग्न झाल्यानंतर सलमान खान दोघांसोबत बोलत नाही. सलमान खान याच्यासोबत ब्रेकअप केल्यानंतर ऐश्वर्याने अभिषेक याच्यासोबत लग्न केलं. अनेक वर्षांनंतर देखील सलमान ऐश्वर्या - अभिषेक यांचं तोंड देखील पाहत नाही.

एकेकाळी शाहिद कपूर आणि करीना कपूर यांच्या नात्याची चर्चा सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली होती. पण करीना हिचं शाहिद याच्यासोबत असलेलं नातं अभिनेत्रीच्या आईला मान्य नव्हतं.. अशात दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. आता दोघे त्यांच्या आयुष्यात आनंदी आहेत.

तापसी पन्नू आणि कंगना रनौत यांच्यामध्ये देखील प्रचंड वाद आहेत. तपासी कंगनाची बहीण रंगोली चंदेल हिला सस्ती कॉपी असं म्हणाली होती... त्यानंतर तापसी आणि कंगना एकमेकींचं तोंड देखील पाहत नाहीत.

सोनम कपूर आणि ऐश्वर्या राय देखील एकमेकींसोबत बोलत नाही. कारण एकदा सोमन हिने ऐश्वर्या हिला काकू म्हणून हाक मारली होती. तेव्हापासून सोनम कपूर आणि ऐश्वर्या राय एकमेकींचं तोंड देखील पाहत नाहीत.