
काल ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा दारुण पराभव झाला. या पराभवानंतर सोशल मीडियावर टीम इंडियाच्या गोलंदाजीवरुन वेगवेगळी चर्चा रंगल्याचं दिसून आलं. भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवरुन देखील त्याला टीकेला सामोरं जावं लागलं. असं नेमकं काय झालं की भुवनेश्वरकुमार टीकेचा धनी झाला. याविषयी वाचा...

ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळताना भारतानं पहिले फलंदाजी केली. यावेळी ऑस्ट्रेलियाला 209 धावांचं टार्गेट देण्यात आलं. यानंतर ऑस्ट्रेलिया मैदानात टार्गेट पूर्ण करण्यासाठी उतरली पण, यावेळी टीम इंडियाची गोलंदाजी कमकुवत ठरली, असा आरोप सोशल मीडियावर होऊ लागला.

भुवनेश्वर कुमारच्या 19व्या ओव्हरची चांगलीच चर्चा रंगली. यावरुन खूप टीकाही झाली. तर गोलंदाजीविषयी बोललं देखील गेलं.

मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या टी-20 सीरिजच्या पहिल्या सामन्यात शेवटच्या दोन ओव्हरमध्ये 18 धावांची गरज होती. भुवनेश्वरनं 19व्या ओव्हरमध्ये 16 धावा ऑस्ट्रेलियाला देऊन टाकल्या. यामुळे ही ओव्हर टीम इंडियासाठी खूप त्रासदायक ठरली.

पाकिस्तानला आशिया चषकात सुपर चार सामन्यात शेवटच्या दोन ओव्हरमध्ये 26 धावांची गरज होती. तेव्हा 19व्या ओव्हरमध्ये भुवनेश्वरनं 19 रन दिले होते.