
राजकोट कसोटीच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाने सामन्यावर आपली पकड मजबूत मिळवली. भारताच्या 300 धावांचा पल्ला ओलांडला आहे. दुसऱ्या डावात रोहित शर्मा लवकर बाद झाल्यानंतर शुबमन गिल आणि यशश्वी जयस्वाल यांनी मोर्चा सांभाळला.

यशस्वी जयस्वालच्या शतकानंतर गिलनेही आपले अर्धशतक पूर्ण केले. यशस्वीने षटकार मारून आपले अर्धशतक पूर्ण केले होते. तीच रणनिती अवलंबून गिलनेही मार्क वुडच्या चेंडूवर षटकार ठोकून अर्धशतक पूर्ण केले.

शुबमन गिलने 98 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या. यादरम्यान त्याने 4 चौकार आणि 2 षटकार मारले. गिलचे कसोटी कारकिर्दीतील हे पाचवं अर्धशतक आहे. राजकोट कसोटीच्या पहिल्या डावात गिलला खातेही उघडता आलं नव्हतं.

शुबमन गिलने आतापर्यंत 14 डावांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. पहिल्या 11 डावात त्याने 22.30 च्या सरासरीने 223 धावा केल्या आणि त्याची सर्वोत्तम धावसंख्या 47 धावा होती. तर दुसऱ्या डावातील तीन डावात त्याने 104, 0 आणि अर्धशतक केले.

शुबमन गिल आतापर्यंत 23 सामन्यात 43 झावात खेळला आहे. यात त्याचा सर्वोत्तम धावसंख्या ही 128 आहे. आतापर्यंत एकूण 1266 धावा केल्या आहेत. यात 3 शतकं आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे. 59.08 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.

भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज