
टीम इंडियाने अंडर 19 वर्ल्ड कप 2024 फायनलमध्ये धडक मारली आहे. टीम इंडियाने 6 फेब्रुवारीला दक्षिण आफ्रिकेवर 2 विकेट्सने विजय मिळवला. टीम इंडियाची फायनलमध्ये पोहचण्याची ही सलग पाचवी आणि एकूण नववी वेळ ठरली आहे.

टीम इंडियाने पहिल्यांदा 2000 साली अंडर 19 वर्ल्ड कपचा किताब जिंकला होता. मोहम्मद कैफ याच्या नेतृत्वात टीम इंडिया चॅम्पियन ठरली होती.

टीम इंडियाला दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकण्यासाठी 8 वर्षांची प्रतिक्षा करावी लागली. टीम इंडियाची 8 वर्षांची प्रतिक्षा विराट कोहली याने संपवली. विराटने टीम इंडियाला आपल्या नेतृत्वात वर्ल्ड कप मिळवून दिला.

टीम इंडियाने तिसरा वर्ल्ड कप 4 वर्षांनी जिंकला. उनमुक्त चंद याने भारताला विश्व विजेता केलं होतं.

त्यानंतर टीम इंडियाने पुढील वर्ल्ड कप 6 वर्षांनी जिकंला. मुंबईकर पृथ्वी शॉ याने आपल्या नेतृत्वात 2018 साली टीम इंडियाला चॅम्पियन केलं.

टीम इंडियाने अखेरचा अंडर 19 वर्ल्ड कप 2022 साली जिंकला. तेव्हा यश धुळ याने भारताला नेतृत्वात विजयी केलं.