14 वर्षांआधी वेस्ट इंडिजमध्ये भारत-अफगाणिस्तान भिडले त्या मॅचमध्ये काय घडलं होतं?
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सुपर-8 मधील सामना आहे. भारतीय संघ तुल्यबळ मानला जात असला तरीपण अफगाणिस्तानचा आताचा संघ काही कमी नाही. 2010 साली भारत-अफगाणिस्तान भिडले होते त्यावेळी सामन्यात काय घडलं होतं जाणून घ्या.
1 / 5

अफगाणिस्तान संघाने 20 षटकात 8 गडी गमावून केवळ 115 धावा केल्या होत्या. अफगाणिस्तान संघाकडून नूर अली जद्रान याने सर्वाधिक 50 धावा केल्या होत्या. टीम इंडियाकडून आशिष नेहराने तीन विकेट घेतल्या होत्या.
2 / 5

2010 साली टी२० वर्ल्ड कपमध्ये भारत आणि अफगाणिस्तान एका ग्रुपमध्ये होते. १ मेला लुसिया येथील डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर पार पडला होता.
3 / 5

या सामन्यात भारताने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अफगाणिस्तानने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पण त्यांना तो झेपला नाही.
4 / 5

अफगाणिस्तान संघाच्या लक्ष्याचा टीम इंडियाने यशस्वीपणे पाठलाग केला होता. अवघ्या 14.5 ओव्हरमध्ये टीम इंडियाने हे टार्गेट पूर्ण केलं होतं.
5 / 5

दरम्यान, आजच्या सामन्यात अफगाणिस्तान संघ टीम इंडियाला राशिद खान याच्या नेतृत्त्वात कडवी झुंज देण्याचा प्रयत्न करेल.
Follow Us