पांढऱ्या साडीत महिला ट्रेनसमोर धावायची, भारतातील सर्वात भुताटकी रेल्वे स्टेशन, 42 वर्षं एकही ट्रेन थांबली नाही

भारतातील असं एक स्टेशन जिथे दिसायचे भूत, यायचे भयानक आवाज, ट्रेनच्या पुढे पळायची पळायची महिला. रेल्वे कर्मचारी काम करण्यास द्यायचे नकार. 42 वर्षे बंद ठेवण्यात आले होते स्टेशन.

| Updated on: Mar 25, 2026 | 12:00 PM
1 / 7
भारतात अशी काही रेल्वे स्टेशन आहेत, जी वेगवेगळ्या गोष्टींसाठी ओळखली जातात. यामध्ये काही ठिकाणी लोकांना भूत दिसते, तर काही ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी घडताना दिसतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्टेशनबद्दल सांगणार आहोत.

भारतात अशी काही रेल्वे स्टेशन आहेत, जी वेगवेगळ्या गोष्टींसाठी ओळखली जातात. यामध्ये काही ठिकाणी लोकांना भूत दिसते, तर काही ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी घडताना दिसतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका स्टेशनबद्दल सांगणार आहोत.

2 / 7
भारतातील असं एक स्टेशन जे भुताटकी स्टेशन म्हणून ओळखले जाते. 42 वर्षे झाली तरी या ठिकाणी कोणतीही रेल्वे थांबत नाही. कुठे आहे हे स्टेशन? काय आहे नेमकं कारण?

भारतातील असं एक स्टेशन जे भुताटकी स्टेशन म्हणून ओळखले जाते. 42 वर्षे झाली तरी या ठिकाणी कोणतीही रेल्वे थांबत नाही. कुठे आहे हे स्टेशन? काय आहे नेमकं कारण?

3 / 7
गूढ आणि भीतीदायक कहाणीमुळे चर्चेत आलेले पश्चिम बंगालमधील बेगुनकोडोर रेल्वे स्टेशन आजही लोकांच्या कुतूहलाचा विषय आहे. पश्चिम बंगालमधील पुरुलिया जिल्हा येथे असलेल्या या स्टेशनबाबत अनेक वर्षांपासून असा दावा केला जात होता की येथे रात्री भुतांचा वावर असतो.

गूढ आणि भीतीदायक कहाणीमुळे चर्चेत आलेले पश्चिम बंगालमधील बेगुनकोडोर रेल्वे स्टेशन आजही लोकांच्या कुतूहलाचा विषय आहे. पश्चिम बंगालमधील पुरुलिया जिल्हा येथे असलेल्या या स्टेशनबाबत अनेक वर्षांपासून असा दावा केला जात होता की येथे रात्री भुतांचा वावर असतो.

4 / 7
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रात्री उशिरा पांढऱ्या साडीतील एक महिला ट्रॅकवर फिरताना दिसायची. काहींनी तर असेही सांगितले की ट्रेन येताच हे भूत ट्रॅकवर धावत किंवा नाचत असत.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रात्री उशिरा पांढऱ्या साडीतील एक महिला ट्रॅकवर फिरताना दिसायची. काहींनी तर असेही सांगितले की ट्रेन येताच हे भूत ट्रॅकवर धावत किंवा नाचत असत.

5 / 7
या रहस्याची सुरुवात 1967 सालातील एका दुर्दैवी घटनेपासून झाली असे सांगितले जाते. एका महिलेचा आणि तिच्या लहान मुलाचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू झाला. त्यानंतर काही दिवसांतच स्टेशन मास्टरचा मृतदेह त्याच ठिकाणी आढळल्याची चर्चा झाली. या घटनांनंतर भीतीचे वातावरण आणखी गडद झाले.

या रहस्याची सुरुवात 1967 सालातील एका दुर्दैवी घटनेपासून झाली असे सांगितले जाते. एका महिलेचा आणि तिच्या लहान मुलाचा रेल्वेखाली चिरडून मृत्यू झाला. त्यानंतर काही दिवसांतच स्टेशन मास्टरचा मृतदेह त्याच ठिकाणी आढळल्याची चर्चा झाली. या घटनांनंतर भीतीचे वातावरण आणखी गडद झाले.

6 / 7
या घटनांनंतर स्टेशनवरील कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली. अनेक रेल्वे कर्मचाऱ्यांनी येथे ड्युटी करण्यास नकार देत. अफवा आणि भीती इतकी वाढली की हळूहळू ट्रेन देखील येथे थांबवणे बंद झाले. परिस्थिती इतकी गंभीर झाली की हे स्टेशन तब्बल 42 वर्षे बंद ठेवावे लागले.

या घटनांनंतर स्टेशनवरील कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड भीती निर्माण झाली. अनेक रेल्वे कर्मचाऱ्यांनी येथे ड्युटी करण्यास नकार देत. अफवा आणि भीती इतकी वाढली की हळूहळू ट्रेन देखील येथे थांबवणे बंद झाले. परिस्थिती इतकी गंभीर झाली की हे स्टेशन तब्बल 42 वर्षे बंद ठेवावे लागले.

7 / 7
दीर्घकाळ बंद राहिल्यानंतर 2009 साली रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा हे स्टेशन सुरू केले. सुरुवातीला भीतीचे वातावरण कायम असले तरी हळूहळू परिस्थिती सामान्य झाली आणि आता येथे नियमित रेल्वे सेवा सुरू आहे.

दीर्घकाळ बंद राहिल्यानंतर 2009 साली रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा हे स्टेशन सुरू केले. सुरुवातीला भीतीचे वातावरण कायम असले तरी हळूहळू परिस्थिती सामान्य झाली आणि आता येथे नियमित रेल्वे सेवा सुरू आहे.

Follow Us