
महाराष्ट्रात वाघ आणि बिबट्याच्या शिकारीच्या आकड्यांनी वन विभागाची झोप उडालीय. राज्यात गेल्या चार वर्षात वीजप्रवाह आणि विषप्रयोगामुळे २४ वाघ आणि ५६ बिबट्या शिकाऱ्यांच्या सापळ्यात अडकलेत.

नागपूरातील RTI कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी टाकलेल्या माहिती अधिकारात, हे धक्कादायक वास्तव पुढे आलंय. यावरुन शिकार आणि शिकारी रोखण्यात वनविभाग सपशेल फेल ठरल्याचं दिसून येतंय.

चालू वर्षात आतापर्यंत देशात 102 वाघांचा मृत्यू

प्रादेशिक विभागात दक्षता पथक आहे. तरीही वन विभागाची यंत्रणा वाघांच्या संरक्षणात कमी पडत असल्याचं दिसून येतेय. बिबट्यांच्या मृत्यूमध्ये वाढ होत असताना त्यातही शिकारीचे प्रमाण अधिक आहे.