
भारताने पॅरालिम्पिकमध्ये अप्रतिम प्रदर्शन करत ऐतिहासिक कामगिरी केली. एकूण 19 पदकं खिशात घातली. ज्यामध्ये 5 सुवर्ण, 8 रौप्य आणि 6 कांस्य पदकांचा समावेश आहे, पदक मिळवण्याच्या स्पर्धेत भारत 24 व्या स्थानावर राहिला.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टोक्यो पॅरालिम्पिकमधील सहभागी खेळाडूंची भेट घेतली. त्यांना नाश्त्यासाठी बोलवलं होतं. यावेळी खेळाडूंनी त्यांना सर्वांचे हस्ताक्षर असलेला स्टोलही भेट म्हणून दिला.

मोदीजींनी पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूंशी याआधी फोनवरुन चर्चा केली होती. त्यानंतर आता प्रत्यक्षात देखील खेळाडूंची भेट घेतली. यावेळी त्यांनी नोएडाचे जिल्हाधिकारी आणि रौैप्य पदक विजेते सुहास याथिराज यांचीही भेट घेतली.

सुहाससोबतच मोदीजींनी बॅडमिंटनपटू कृष्णा नगारसह युवा पलक कोहलीशीही बराच वेळ बातचीत केली. भारताने यावेळी बॅडमिंटनमध्ये चार पदकं मिळवली.