Tukaram Mundhe : बिअर आणू का? चक्क तुकाराम मुंढेंनाच विचारलं, क्षणात प्रचंड राग आला अन्…मुंढेंनी सांगितला खास किस्सा!
दरम्यान, त्यांनी यूपीएससीची तयारी करण्याच्या काळात त्यांच्यासोबत घडलेला एक किस्सा सांगितला आहे. वेटरने त्यांना चक्क बिअर आणू का अशी विचारणा केली होती. त्यानंतर मात्र तुकाराम मुंढे यांना प्रचंड राग आला होता.

तुकाराम मुंढे हे धडाडाचे आयएएस अधिकारी आहे. सध्या ते राज्याच्या अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त आहेत. हे पद स्वीकारल्यापासून भेसळयुक्त खाद्यपदार्थांची निर्मिती, विक्री करणाऱ्यांविरोधात ते कठोर कारवाई करत आहेत.

त्यांनी नुकतेच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी भेसळयुक्त अन्न, त्यांची काम करण्याची पद्धत तसेच त्यांच्या विद्यार्थी जीवनावरही भाष्य केलंय. त्यांनी भेसळयुक्त खाद्यपदार्थांवर आळा बसावा म्हणून पुढची योजनाही जाहीर केली.

दरम्यान, त्यांनी यूपीएससीची तयारी करण्याच्या काळात त्यांच्यासोबत घडलेला एक किस्सा सांगितला आहे. वेटरने त्यांना चक्क बिअर आणू का अशी विचारणा केली होती. त्यानंतर मात्र तुकाराम मुंढे यांना प्रचंड राग आला होता.

यूपीएससी'च्या तयारीदरम्यान १९९६ मध्ये पहिल्यांदा दिल्लीला गेल्याचा किस्सा त्यांनी सांगितला. 'दिल्लीतील जवाहर बुक डेपोमधून पुस्तके घेतल्यानंतर पहाडगंजमधील एका हॉटेलमध्ये थांबलो होतो,' असं मुंढे यांनी सांगितलं.

त्या वेळी वेटरने ‘बीयर आणू का?’ असे विचारताच मला संताप आला. मी तातडीने बॅग पॅक केली आणि रेल्वे स्थानक गाठले. तिकीट नसतानाही कर्नाटक एक्स्प्रेसचे जनरल तिकीट काढून टॉयलेटजवळ बसत भुसावळपर्यंत प्रवास केल. तेथून बसने संभाजीनगर गाठले, अशी आठवण त्यांनी सांगितली.