
तुळशीच्या पानांना आयुर्वेदात महत्त्वाचे स्थान आहे. रोज तुळशीची पाच ते सात पानं खाल्ल्याने त्याचा शरीरावर चांगला परिणाम पडतो.

तुळशीची पान खाल्ल्यास रोगप्रतिकार शक्तीमध्ये वाढ होते. तुळशीमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप यापासून आपले संरक्षण होते.

तुळशीची पानं खाल्ल्यास तणावापासून मुक्ती मिळते. कारण या झाडाच्या पानांचे सेवन केल्यास स्ट्रेस हार्मोन कमी होते.

तुळशीची पाने खाल्ल्याने बुद्धीचा चांगला विकास होतो. स्मरणशक्तीही वाढण्यास मदत होते.

तुळशीच्या पानांचे सेवन केल्यास पोट साफ राहते. अॅसिटिडी कमी होते.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.