
इंदापूर तालुक्यातील बावडा बागल फाटा येथील गोरख जालिंदर नलावडे यांच्या शेतातील डाळींब बागेतील हाताशी आलेले डाळींब पीक चोरीला गेले आहे.

शेतकऱ्याचे सुमारे अडीच टन डाळिंब चोरीला गेले आहेत.

त्यामुळे शेतकऱ्याचे चार लाखांचे नुकसान झाले आहे.

या संदर्भात इंदापूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

रात्रीत डाळिंब चोरीला गेल्यामुळे परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत.

पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करीत आहे.