
भारता वर्ल्ड कपमध्ये सलग आठ सामने जिंकणारा एकमेव संघ आहे. रोहितच्या नेतृत्त्वाखाली संघ दमदार कामगिरी करत असून यंदा प्रबळ दावेदार असल्यासारखंच प्रदर्शन होत आहे.

भारताच्या यशामागचं नेमकं काय गणित असावं, सर्व खेळाडू आपलं 100 टक्के देत असलेलं पाहायला मिळत आहे. पाकिस्तानच्या खेळाडूने या यशामागचं खरं कारण सांगितलं आहे.

टीम इंडियाला कसे हरवायचे हाच विचार न्यूझीलंड, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेसह सर्व विश्वचषक संघ करत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय संघानचं प्लॅनिंग असल्याचं वसीम अक्रम याने म्हटलं आहे.

मुख्य खेळाडू बाहेर असताना नव्या दमाचे सुर्यकुमार यादवसारखे खेळाडू ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळले त्यांचा वर्ल्डकपमध्येही समावेश गेला असल्याचं अक्रम म्हणाला.

भारतीय संघ: रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन, प्रसिद्ध कृष्णा, सूर्यकुमार यादव .