PM MODI PUNJAB | समजून घ्या, नेमकं मोदींसोबत पंजाबमध्ये काय झालं? सुरक्षेतली चूक की आणखी काही?

| Updated on: Jan 05, 2022 | 5:50 PM

हजारो लोकांनी पंजाबमध्ये झालेल्या घटनेवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावरुन राजकीय आरोप प्रत्यारोपांनाही सुरुवात झाली आहे. नेमकं पंजाबमध्ये मोदींसोबत काय झालंय, चला समजून घेऊयात...

1 / 8
ट्विटरवर PM MODI PUNJAB ट्रेन्ड होऊ लागलंय. अनेक पोस्ट ट्विटरवर पडत आहेत. हजारो लोकांनी पंजाबमध्ये झालेल्या घटनेवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावरुन राजकीय आरोप प्रत्यारोपांनाही सुरुवात झाली आहे. नेमकं पंजाबमध्ये मोदींसोबत काय झालंय, चला समजून घेऊयात... (PHOTO Source - Twitter)

ट्विटरवर PM MODI PUNJAB ट्रेन्ड होऊ लागलंय. अनेक पोस्ट ट्विटरवर पडत आहेत. हजारो लोकांनी पंजाबमध्ये झालेल्या घटनेवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावरुन राजकीय आरोप प्रत्यारोपांनाही सुरुवात झाली आहे. नेमकं पंजाबमध्ये मोदींसोबत काय झालंय, चला समजून घेऊयात... (PHOTO Source - Twitter)

2 / 8
पीटीआय आणि एनएआयनं दिलेल्या माहितीनुसार, मोदींचा ताफा हा पंजाबमध्ये काही काळ अडकून पडला होती. समोर आलेल्या माहितीनुसार 15 ते 20 मिनिटं हा ताफा एका उड्डाणपुलावर अडकला होता. (PHOTO Source - Twitter)

पीटीआय आणि एनएआयनं दिलेल्या माहितीनुसार, मोदींचा ताफा हा पंजाबमध्ये काही काळ अडकून पडला होती. समोर आलेल्या माहितीनुसार 15 ते 20 मिनिटं हा ताफा एका उड्डाणपुलावर अडकला होता. (PHOTO Source - Twitter)

3 / 8
हाती आलेल्या माहितीनुसार, सुरक्षेत झालेल्या मोठ्या चुकीमुळे असं झाल्यांचं प्रथमदर्शनी सांगितलं जातंय. दरम्यान, यामुळे मोदींनी पंजाबच्या फिरोजपुरात आयोजित केलेल्या सभेला जाता आलं नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानं याबाबतची माहिती दिली आहे. (PHOTO Source - Twitter)

हाती आलेल्या माहितीनुसार, सुरक्षेत झालेल्या मोठ्या चुकीमुळे असं झाल्यांचं प्रथमदर्शनी सांगितलं जातंय. दरम्यान, यामुळे मोदींनी पंजाबच्या फिरोजपुरात आयोजित केलेल्या सभेला जाता आलं नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानं याबाबतची माहिती दिली आहे. (PHOTO Source - Twitter)

4 / 8
बुधवारी मोदींची फिरोजपूरमध्ये सभा होणार होता. त्यासाठी पंजाबमध्ये दाखल झाले होते. हुसैनीवाला राष्ट्रीय शहीद स्मारकापासून अवघ्या तीस किलोमीटरच्या अंतरावर मोदींचा ताफा एका उड्डाण पुलावर पोहोचला आणि तिथेच अडकला. (PHOTO Source - Twitter)

बुधवारी मोदींची फिरोजपूरमध्ये सभा होणार होता. त्यासाठी पंजाबमध्ये दाखल झाले होते. हुसैनीवाला राष्ट्रीय शहीद स्मारकापासून अवघ्या तीस किलोमीटरच्या अंतरावर मोदींचा ताफा एका उड्डाण पुलावर पोहोचला आणि तिथेच अडकला. (PHOTO Source - Twitter)

5 / 8
काही आंदोलकांनी रस्ता अडवल्याचं लक्षात आल्याकारणामुळे मोदींचा ताफा अडकल्याची माहिती समोर आली. मोदींच्या सुरक्षेतली ही मोठी चूक मानली जाते आहे. पोलीस आणि इतर वाहतूक यंत्रणांच्या उपस्थितीत असं नेमकं घडलंच तरी कसं, असाही प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. (PHOTO Source - Twitter)

काही आंदोलकांनी रस्ता अडवल्याचं लक्षात आल्याकारणामुळे मोदींचा ताफा अडकल्याची माहिती समोर आली. मोदींच्या सुरक्षेतली ही मोठी चूक मानली जाते आहे. पोलीस आणि इतर वाहतूक यंत्रणांच्या उपस्थितीत असं नेमकं घडलंच तरी कसं, असाही प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. (PHOTO Source - Twitter)

6 / 8
दरम्यान, या विषयाची गंभीर दखल केंद्रीय गृह मंत्रालयानं घेतली आहे. पंजाब सरकारकडे याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयानं स्पष्टीकरण मागितलंय. (PHOTO Source - Twitter)

दरम्यान, या विषयाची गंभीर दखल केंद्रीय गृह मंत्रालयानं घेतली आहे. पंजाब सरकारकडे याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयानं स्पष्टीकरण मागितलंय. (PHOTO Source - Twitter)

7 / 8
खरंतर पंजाबात पाऊस आणि दृश्यमानता कमी असल्यानं मोदी रस्ते मार्गे सभास्थळी जाण्यासाठी निघाले होते. पंजाबच्या पोलिस महासंचालकांनी सुरक्षा व्यवस्थेबाबत दुजोरा दिल्यानंतर त्याचा ताफा रवाना झाला होता. मात्र तरिही वाटेत सुरक्षेत मोठी चूक कशी झाली? यामागे काही कट होता का? की पंजाब सरकारनं जाणीवपूर्वक मोदींना जाण्यापासून रोखलं? या प्रश्नांवरुन आता राजकीय संघर्ष पेटलाय. (PHOTO Source - Twitter)

खरंतर पंजाबात पाऊस आणि दृश्यमानता कमी असल्यानं मोदी रस्ते मार्गे सभास्थळी जाण्यासाठी निघाले होते. पंजाबच्या पोलिस महासंचालकांनी सुरक्षा व्यवस्थेबाबत दुजोरा दिल्यानंतर त्याचा ताफा रवाना झाला होता. मात्र तरिही वाटेत सुरक्षेत मोठी चूक कशी झाली? यामागे काही कट होता का? की पंजाब सरकारनं जाणीवपूर्वक मोदींना जाण्यापासून रोखलं? या प्रश्नांवरुन आता राजकीय संघर्ष पेटलाय. (PHOTO Source - Twitter)

8 / 8
शेतकरी आंदोलनवेळी तब्बल 15 महिने पंजाबमधील शेतकरी दिल्लीत आंदोलन करत होते. दरम्यान, आता 15 मिनिटं मोदी एका फ्लायओव्हरवर अडकून पडल्यानं त्याचा मोठा गवगवा केला जातोय, असाही सूर ऐकायला मिळतोय. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही घटना पंजाबच्या राजकारण तापवणार असल्याची प्रतिक्रिया राजकीय जाणकारांनी दिली आहे. (PHOTO Source - Twitter)

शेतकरी आंदोलनवेळी तब्बल 15 महिने पंजाबमधील शेतकरी दिल्लीत आंदोलन करत होते. दरम्यान, आता 15 मिनिटं मोदी एका फ्लायओव्हरवर अडकून पडल्यानं त्याचा मोठा गवगवा केला जातोय, असाही सूर ऐकायला मिळतोय. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही घटना पंजाबच्या राजकारण तापवणार असल्याची प्रतिक्रिया राजकीय जाणकारांनी दिली आहे. (PHOTO Source - Twitter)