
भारतात रेल्वेचं मोठं जाळं आहे. जम्मू काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत भारतात रेल्वेचं जाळं पसरलेलं आहे. देशात तर काही ठिकाणी अतिशय कठीण आणि अडचणीच्या ठिकाणी रेल्वे पोहोचलेली आहे.

भारतात एक सर्वात मोठी रेल्वे आहे. या रेल्वेचे नाव रुद्राक्ष असे आहे. ही एक मालवाहू रेल्वे आहे. याची एकूण लांबी तब्बल 4.5 किलोमीटर लांब आहे. या रेल्वेला एकूण 354 डब्बे आहेत, असे म्हटले जाते.

या ट्रेनला एकूण सात इंजिन आहेत. भारतातील सर्वात मोठ्या ट्रेनचे नाव रुद्राक्ष असे आहे. पण जगातली सर्वात मोठी रेल्वे भारतात नाही. ही रेल्वे ऑस्ट्रेलियात आहे.

ऑस्ट्रेलियातील या रेल्वेचे नाव द ऑस्ट्रेलियन बीएचपी आयरन ओर असे आहे. ही रेल्वेसुद्धा एक मालगाडी आहे. या रेल्वेची लांबी तब्बल 7.3 किमी लांब आहे, असे म्हटले जाते. या रेल्वेला तब्बल 682 डब्बे आहेत.

या रेल्वेची लांबी एवढी आहे की ती एकूण 22 आएफल टॉवरएवढी लांब आहे. या रेल्वेला एकूण आठ इंजिन ओढतात. या ट्रेनला एकूण 5648 चाक आहेत, असे म्हटले जाते.

या रेल्वेची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे. या रेल्वेचे वजन तब्बल एक लाख टन एवढे असू शकते, असा अंदाज लावला जातो.