
मृत्यूनंतर शरीरात अनेक बदल काही मिनिटातच पाहायला मिळतात. आत्माच नसल्याने देहरूपी शरीर उरतं. या शरीरात अनेक बदल पाहायला मिळतात. त्वचेचा रंग बदलतो. श्वास थांबतो. हृदयाचे ठोके बंद होता. मेंदू काम करत नाही. असं बरंच काही झटपट घडत जातं. यात मृतदेहाचं तोंड खुलं असल्याचं आपण पाहीलं असेल. असं का होतं? ते जाणून घेऊयात (Photo: Pixabay/Pexels)

मृत्यूनंतर शरीरातील प्रत्येक पेशी रिलॅक्स होते. यात जबड्याच्या मासपेशींचाही समावेश आहे. मृत्यूनंतर शरीर जबड्याच्या मासपेशीवर नियंत्रण सोडतो. त्यामुळे जबडा सैल होतो. त्यामुळे मृत्यूनंतर मृतदेहाचं तोंड खुलं होतं. (Photo: Pixabay/Pexels)

वैज्ञानिक दृष्टीने पाहता मृत्यूनंतर माणसाच्या मेंदूचं मासपेशींवर नियंत्रण संपतं. मग तोंड उघडं किंवा बंद करणं असो किंवा शरीरातील इतर भाग.. या सर्वांवर माणसाचं नियंत्रण संपतं. त्यामुळे फक्त तोंडचं खुलं राहात नाही तर हातपाय देखील सैल पडतात. (Photo: Pixabay/Pexels)

मृत्यूनंतर मृतदेहाचं तोंड खुलं राहण्याचं कारण गुरुत्वाकर्षण बळ देखील आहे. जेव्हा मृतदेह पाठीवर पडलेला असतो. तेव्हा गुरुत्वाकर्षणामुळे जबडा खाली खेचला जातो. त्यामुळे तोंड खुलं राहतं. विज्ञानानुसार, मृत्यूनंतर मृतदेहाचं तोंड खुलं राहणं ही एक नैसर्गिक आणि सामान्य जैविक प्रक्रिया आहे. (Photo: Pixabay/Pexels)

मृत्यूनंतर शरीरातील ऑक्सिजनची मात्र कमी झाल्यानंतर असं घडतं. यामुळे तोंड खुलं राहतं. मृत्यूच्या वेळी श्वास वेगाने खेचला जातो आणि त्यामुळे अशी स्थिती उद्भवू शकते. (Photo: Pixabay/Pexels)