
भारताचं रेल्वे नेटवर्क हे जगातील सर्वात मोठ्या रेल्वे नेटवर्कपैकी एक आहे. यात दररोज लाखो लोक प्रवास करतात. अनेकांना हा प्रवास खूप आरामदायी वाटतो. म्हणूनच प्रत्येक वर्गासाठी यात सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. श्रीमंतांसाठी फर्स्ट एसी कोच आहेत, तर सामान्य माणसांसाठी जनरल कोच.

श्रीमंत लोक बहुतांश एसी कोचमधून प्रवास करतात, मध्यमवर्गीय सामान्य स्लीपर कोचमधून आणि गरीब लोक जनरल कोचमधून प्रवास करतात. जनरल कोच हे ट्रेनच्या पुढे आणि मागे असतात.

पण तुम्ही कधी विचार केला आहे का की जनरल डब्बे नेहमी पहिल्या आणि शेवटच्या स्थानावरच का असतात? ट्रेनच्या मध्यभागी का नाहीत, जसं एसी आणि स्लीपर कोच असतात? यामागे खरं तर एक खास कारण आहे.

प्रत्येक ट्रेनचं लेआउट जवळपास एकसारखं असतं. म्हणजे इंजिनच्या मागे एसी-3, एसी-2, स्लीपर कोच आणि ट्रेनच्या शेवटी म्हणजे मागे जनरल डब्बे असतात. बऱ्याचदा लोक रेल्वेवर आरोप करतात की जनरल कोच नेहमी ट्रेनच्या पुढे किंवा मागे लावून प्रवाशांच्या जीवाशी खेळलं जातं. त्यांना वाटतं की अपघातात नेहमी हेच डबे अडकतात. पण खरं कारण काय आहे?

रेल्वेने अशा आरोपांचं पूर्णपणे खंडन केलं आहे. ट्रेन संचालन नियमांनुसार, प्रत्येक डब्याचं स्थान रेल्वे नियमांनुसार ठरवलं जातं आणि श्रीमंत किंवा गरीब यांच्या आधारावर कोणताही भेदभाव केला जात नाही. ट्रेनच्या सुरुवातीला किंवा शेवटी जनरल कोच का लावले जातात, याचं खरं कारण रेल्वेने सांगितलं आहे.

भारतीय रेल्वेनुसार, जनरल कोचमध्ये स्लीपर आणि एसी कोचच्या तुलनेत जास्त गर्दी असते. जनरल कोच प्रत्येक स्टेशनवर जास्त प्रवाशांना चढवतात आणि उतरवतात. त्यामुळे गर्दी तर होणारच. अशा परिस्थितीत जर जनरल कोच ट्रेनच्या मध्यभागी लावले गेले, तर ट्रेनच्या मध्यभागी जास्त वजन येईल आणि ट्रेनचं संतुलन बिघडेल.

चढणे-उतरने यातही अडचण येईल. जर जनरल डबा मध्यभागी असेल, तर त्याचा परिणाम बसण्याच्या व्यवस्थेसह इतर व्यवस्थांवरही होईल. ट्रेनच्या पुढे आणि मागे जनरल डबे लावल्याने प्रवाशांची गर्दी समान रीतीने वितरित होते. तसेच, परतीच्या प्रवासात दोन्ही बाजूंना इंजिन जोडल्याने ट्रेनचं संतुलन राखण्यास मदत होते.

रेल्वे तज्ज्ञांच्या मते, ट्रेनच्या सुरुवातीला किंवा शेवटी जनरल कोच जोडणे प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून फायदेशीर आहे. इतकंच नाही, तर अपघात, रुळावरून घसरणे किंवा आग लागणे यासारख्या आपत्कालीन परिस्थितीत जास्त प्रवाशी असलेल्या या डब्यांमधून लोकांना तातडीने बाहेर काढता येतं.