एक-दोन नव्हे, मोदींचे तब्बल 36 मंत्री जम्मू काश्मीर दौऱ्यावर, कारण काय?

| Updated on: Jan 17, 2020 | 11:56 AM

जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम 370 रद्द करुन आता जवळपास पाच महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. एकीकडे सरकार दावा करत आहे की जम्मू काश्मीरमध्ये सर्वकाही सुरळीत आहे.

एक-दोन नव्हे, मोदींचे तब्बल 36 मंत्री जम्मू काश्मीर दौऱ्यावर, कारण काय?
तामिळनाडूतील भाजप नेत्यांमुळे भाजपच्या पक्षश्रेष्ठींवर तोंडघशी पडण्याची वेळ
Follow us on

श्रीनगर : जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम 370 रद्द करुन आता जवळपास पाच महिन्याहून अधिक काळ लोटला आहे. एकीकडे सरकार दावा करत आहे की जम्मू काश्मीरमध्ये सर्वकाही सुरळीत आहे. (Modi Ministers to visit jammu and kashmir ) तर दुसरीकडे सर्वकाही ठिक असेल तर आम्हाला तिकडे जाऊ का दिलं जात नाही, असा प्रश्न विरोधीपक्ष विचारत आहेत. राज्यात संपूर्णपणे इंटरनेटसेवा अजूनही सुरळीत नाही. अनेक नेते आजही नजरकैदेत आहेत. (Modi Ministers to visit jammu and kashmir )

सत्ताधारी आणि विरोधकांच्या आरोप प्रत्यारोपानंतर मोदी सरकारचे तब्बल 36 मंत्री 18 ते 25 जानेवारीदरम्यान जम्मू काश्मीर दौऱ्यावर जाणार आहेत.

ऑल इंडिया रेडिओच्या वृत्तानुसार सर्व मंत्री जम्मू आणि काश्मीरच्या विविध भागात जाऊन, कलम 370 हटवल्यानंतरची परिस्थिती नागरिकांकडून जाणून घेणार आहेत. शिवाय सरकारमार्फत केल्या जाणाऱ्या विकासकामांची माहितीही देणार आहेत.

कायदेमंत्री रवीशंकर प्रसाद आणि मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांच्यासह 5 मंत्री काश्मीर खोऱ्यात, तर अन्य सर्व मंत्री जम्मूमध्ये जाऊन प्रचार-प्रसार करणार आहेत.  मोदी सरकारचे हे सर्व मंत्री दोन्ही विभागातील विविध जिल्ह्यात 24 जानेवारीपर्यंत राहतील.

दरम्यान, विरोधकांनी सरकारच्या या निर्णयावरही टीका केली आहे. सरकार आधी कायदा संमत करुन घेते आणि मग नागरिकांकडून त्याला समर्थन मागते, हा मोदी सरकारचा डाव आहे, असं विरोधकांनी म्हटलं.

तर भाजपकडून हा विकास कामांसाठी जम्मू काश्मीर दौरा असल्याचं म्हणत, याबाबत राजकारण न करण्याचं आवाहन केलं आहे.