AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विद्यार्थी लाभार्थ्यांना कच्चा धान्य पुरवठा करण्याची परवानगी द्या, शिवसेना आमदार प्रा डॉ मनीषा कायंदे यांची मागणी

राज्यातील शाळा (School) एप्रिल (April) आणि मे महिन्यात सुटीमुळे बंद राहणार आहेत. अशा वेळी शालेय पोषण आहाराचे लाभार्थी असलेल्या विद्यार्थ्यांना शिजवलेले अन्न देणे शक्य होणार नाही.

विद्यार्थी लाभार्थ्यांना कच्चा धान्य पुरवठा करण्याची परवानगी द्या, शिवसेना आमदार प्रा डॉ मनीषा कायंदे यांची मागणी
शिवसेना आमदार प्रा डॉ मनीषा कायंदे यांची मागणीImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 03, 2022 | 3:46 PM
Share

मुंबई – राज्यातील शाळा (School) एप्रिल (April) आणि मे महिन्यात सुटीमुळे बंद राहणार आहेत. अशा वेळी शालेय पोषण आहाराचे लाभार्थी असलेल्या विद्यार्थ्यांना शिजवलेले अन्न देणे शक्य होणार नाही. म्हणून एप्रिल आणि मे या दोन महिन्यासाठी शालेय पोषण आहाराचे काम करणाऱ्या महिला सहकारी संस्थांना दोन महिने कच्चे धान्य पुरवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या विधान परिषद सदस्य प्रा डॉ मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी केली आहे.

असंख्य शाळांना एप्रिलमध्येच सुटी मिळणार आहे

शालेय अभ्यासक्रम शिकवून पूर्ण झाला असेल अशा शाळा 30 एप्रिल 2022 पर्यंत सुरू ठेवण्याची गरज नाही, असे सुधारित आदेश शालेय शिक्षण विभागाने काढले आहेत. त्यामुळे असंख्य शाळांना एप्रिलमध्येच सुटी मिळणार आहे. पण ज्या शाळांचा अभ्याक्रम पुर्ण झालेला नाही अशा शाळा एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सुरू राहणार आहेत.

दोन महिने शाळांना सुट्या असणार आहे

या महिन्यातही विद्यार्थी फक्त परीक्षा देण्यासाठी दोन-तीन तासाकरता शाळेत येत आहेत. अशा वेळी शालेय पोषण आहार योजनेतून या विद्यार्थ्यांना द्यावे लागणारे अन्न शिजवून देण्यासाठी स्वयंपाकी ठेवणे, किचन चालवणे, अन्न धान्याचा साठा करणे हे अवघड झाले आहे. पुढे जवळपास दोन महिने शाळांना सुट्या असणार आहेत. म्हणून या दोन महिन्यासाठी या महिला सहकारी संस्थांना कच्चे धान्य पुरवठा करण्याची परवानगी द्या, अशी मागणी प्रा डॉ मनीषा कायंदे यांनी शालेय शिक्षण मंत्री प्रा वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे.

Inflation : युवासेनेचं राज्यव्यापी थाळी बजाव आंदोलन, रस्त्यावर भाकरी, पुतळ्याला जोडे, मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी

Pakistan Political Crisis: इमरान खान नॉटआऊट! अविश्वास प्रस्ताव रद्द का झाला? 10 मुद्द्यांमधून समजून घ्या!

मनसे कार्यालयाबाहेरील भोंगे पोलिसांनी उतरवले, महेंद्र भानुशाली पोलिसांच्या ताब्यात

Follow Us
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात.
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.