AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

त्यांनी तर प्रत्येकवेळी देश तोडून राज्य केलं; अनुराग ठाकूर यांचा राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेवर हल्लाबोल

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) आज मुंबई (Mumbai) दौऱ्यावर आहेत. डोंबिवलीमध्ये बोलताना त्यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर जोरदार घणाघात केला आहे.

त्यांनी तर प्रत्येकवेळी देश तोडून राज्य केलं; अनुराग ठाकूर यांचा राहुल गांधींच्या 'भारत जोडो' यात्रेवर हल्लाबोल
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर
| Updated on: Sep 11, 2022 | 2:24 PM
Share

मुंबई:  केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) आज मुंबई (Mumbai) दौऱ्यावर आहेत. डोंबिवलीमध्ये बोलताना त्यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर जोरदार घणाघात केला आहे. इंग्रज भारत सोडून गेले, मात्र इंग्रजांची विचारधारा जपणारे काँग्रेस आज भारतात आहे. काँग्रेस पक्ष जो आज भारत जोडण्याची गोष्ट करतोय त्यांनी प्रत्येकवेळी भारत तोडून भारतावर राज्य केलं असं म्हणत अनुराग ठाकूर यांनी काँग्रेसच्या भारत जोडो आंदोलनावर हल्लाबोल केला.

‘राजकीय फायद्यासाठी कुठल्याही स्थराला जाऊ शकतात’

पुढे बोलताना अनुराग ठाकूर म्हणाले की, राहूल गांधी हे भारत जोडो यात्रेच्या नावाखाली देशभरात फीरत आहेत, मात्र तिथे देखील ते एका धर्माला दुसऱ्या धर्माविरोधात भडकवण्याचं काम करत आहेत. राजकीय फायद्यासाठी ते कुठल्याही स्थराला जाऊ शकतात.

हिंदू धर्माला कायमच कमी दाखवण्याचं काम काँग्रेसने केलं आहे. मात्र आता हे कुठं तरी थांबायला हवं. कर्म आणि धर्म यांचा सन्मान झाला पाहिजे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगती करत आहे. आपण आज जगात अनेक देशांना मागे टाकून पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलो आहोत.

अयोध्येत भव्य राममंदिर

दरम्यान यावेळी ते राम मंदिरावर देखील बोलले आहेत. तुम्ही सर्व जण आज जय श्रीरामचा जयघोष करत आहात. मात्र त्यासाठी चारशे वर्षांपेक्षाही अधिक काळ आपल्याला लढा द्यावा लागला. रामलल्लाचा जन्म ज्या ठिकाणी झाला, त्या ठिकाणी आज त्याचं भव्य मंदिर बनत आहे. या मंदिरासाठी देखील गेले कित्येक वर्ष आपल्याला लढा द्यावा लागला. मात्र जेव्हा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने केंद्रात मोदी सरकार सत्तेत आले, तेव्हा ही वेळ बदलली. आपण न्यायालयीन लढा जिंकला आहे. पुढच्या वर्षभरात अयोध्येत भव्य असे राममंदीर तयार होईल असं ठाकूर यांनी म्हटलं आहे.

Follow Us
प्रशांत किशोर राष्ट्रवादीसोबत काम करणार की नाहीत? पार्थ पवारांनी...
प्रशांत किशोर राष्ट्रवादीसोबत काम करणार की नाहीत? पार्थ पवारांनी....
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न...
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न....
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा...
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा....
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक...
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक....
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात नवी याचिका; NTA ऐवजी स्वतंत्र यंत्रणेकडून.
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात...
मोठी बातमी! रोहित पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, राजकारणात....
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात
रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये; मुंबईत अतिक्रमण हटाव मोहीम, गरीब नगरात.
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ...
राहुल गांधींनी शेअर केला नरेंद्र मोदी यांचा परदेश दौऱ्यातील व्हिडीओ....
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला...
थरारक दृश्य! एक्सप्रेस रुळावरून घसरली अन् डब्बा थेट 20 फुटावर लटकला....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध.....
नागपूर विधानपरिषदेसाठी सर्वपक्षीय फॉर्म्युला? निवडणूक बिनविरोध......