‘वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात होताच कधी? पेंग्विन सेनाप्रमुखांनी उत्तर द्यावं’ आशिष शेलार आक्रमक

| Updated on: Sep 15, 2022 | 12:03 PM

उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे, महाराष्ट्राला सत्य कळलंच पाहिजे. बोलायचे दात वेगळे आणि करायचे वेगळे.. हे चालणार नाही... असा इशारा आशिष शेलार यांनी दिलाय.

वेदांता प्रकल्प महाराष्ट्रात होताच कधी? पेंग्विन सेनाप्रमुखांनी उत्तर द्यावं आशिष शेलार आक्रमक
आशिष शेलार, भाजप मुंबई अध्यक्ष
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबईः शिवसेनेचं मुखपत्र सामनामधून आज वेदांता प्रकल्प (Vedanta Project) गुजरातेत नेल्याची टीका करण्यात आली आहे. मात्र हा प्रकल्प महाराष्ट्रात होताच कधी? सरकारने या प्रकल्पाला परवानगी दिलीच कधी? पेंग्विनसेना प्रमुखांनी याचं उत्तर द्यावं… महाराष्ट्रात भ्रम पसरवण्याचं काम पेंग्विन सेनेच्या माध्यमातून होतंय, असा आरोप आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर केलाय. आज भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेनेसाठी काही प्रश्न उपस्थित केले.

काय म्हणाले शेलार?

पत्रकार परिषदेत शेलार म्हणाले, ‘ हा प्रकल्प महाराष्ट्रात होता म्हणताय तर तो सुरु कधी झाला? मविआने सर्व परवानग्या दिल्या होत्या का? जिथे तो प्रकल्प प्रस्तावित होता, तिथे जागेचं अॅक्विझिशन तरी झालं होतं का? खेचला म्हणताना या सर्व प्रश्नांची उत्तरं अपेक्षित आहेत…

‘याची चौकशी झाली पाहिजे’

वेदांता प्रकल्प राज्याबाहेर गेला म्हणताय तर याची चौकशी करा, अशी विनंती आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. ते म्हणाले, ‘ आता खोटं सहन केलं जाणार नाही. केवळ त्यांच्या मनातला मुख्यमंत्री झाला नाही, म्हणून हिणवणं, यासाठी रान उठवणार असाल तर… उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे, महाराष्ट्राला सत्य कळलंच पाहिजे. बोलायचे दात वेगळे आणि करायचे वेगळे.. हे चालणार नाही… असा इशारा आशिष शेलार यांनी दिलाय.