राज्यपाल Bhagatsingh Koshyari यांची ठाकरे सरकारवर पुन्हा कुरघोडी!, विशेषाधिकाराचा वापर करत ‘त्या’ अधिकाऱ्याचं निलंबन रद्द

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आफल्या विशेषाधिकाराचा वापर करत डॉ. सुनील पोखरणा यांचं निलंबन रद्द केलं आहे. इतकंच नाही तर पुणे जिल्ह्यातील शिरुरच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आलीय. त्यामुळे कोश्यारी यांनी एकप्रकारे पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर कुरघोडी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय.

राज्यपाल Bhagatsingh Koshyari यांची ठाकरे सरकारवर पुन्हा कुरघोडी!, विशेषाधिकाराचा वापर करत 'त्या' अधिकाऱ्याचं निलंबन रद्द
राज्यपाल कोश्यारींकडून डॉ. सुनील पोखरणा यांचं निलंबन रद्दImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 16, 2022 | 9:18 PM

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) आणि ठाकरे सरकारमधील (Thackeray Government) वाद संपण्याचं नाव घेत नाहीत. अर्थसंकल्पीय विधानसभा अध्यक्षांच्या निवडणूक घेण्याची मागणी राज्य सरकारकडून करण्यात आली होती. मात्र, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात असल्यामुळे कोश्यारी यांनी ठाकरे सरकारचा प्रस्ताव फेटाळून लावला. त्यानंतर आज पुन्हा एकदा कोश्यारी यांनी ठाकरे सरकारवर कुरघोडी केल्याचं पाहायला मिळतंय. अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील जळीतकांड प्रकरणात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा (Dr. Sunil Pokharna) यांचं राज्य सरकारकडून निलंबन करण्यात आलं होतं. मात्र, राज्यपाल कोश्यारी यांनी पोखरणा यांचं निलंबन रद्द केलं आहे.

विशेषाधिकाराचा वापर करत डॉ. सुनील पोखरणा यांचं निलंबन रद्द

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आफल्या विशेषाधिकाराचा वापर करत डॉ. सुनील पोखरणा यांचं निलंबन रद्द केलं आहे. इतकंच नाही तर पुणे जिल्ह्यातील शिरुरच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक म्हणूनही त्यांची नियुक्ती करण्यात आलीय. त्यामुळे कोश्यारी यांनी एकप्रकारे पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर कुरघोडी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय. दरम्यान, अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी समिती स्थापन करुन त्याचा अहवाल सरकारकडे पाठवण्यात आला होता. या अहवालात सुनील पोखरणा दोषी असल्याचे सिद्ध झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत 14 जणांचा मृत्यू

अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयात 6 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी भीषण आग लागली होती. या आगीत घटनेच्या दिवशी 14 कोरोनाबधित रुग्णांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला होता. शॉर्टसर्किटमुळे सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास जिल्हा रुग्णालयातील ICU विभागाला आग लागली. या ICU विभागात एकूण 17 कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत होते. आग लागल्यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी जाऊन ही आग आटोक्यात आणली. मात्र या आगीत 11 रुग्णांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. तर अन्य 6 रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यापैकी तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

इतर बातम्या :

अजितदादांकडून आमदारांना होळीचं गिफ्ट! विकास निधीत 1 कोटींची वाढ, PA आणि Driver चा पगारही वाढवला

‘खुशाल चौकशी करा आणि महिन्याभरात निकाल लावा’, Chandrashekhar Bawankule चं सरकारला खुलं आव्हान

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.