Radhakrishna Vikhe Patil : ‘अजितदादा परत आमच्यासोबत या’, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विधानानं खळबळ

| Updated on: Jun 13, 2022 | 12:40 PM

नुकतंच राज्यसभा निवडणूक पार पडली यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षांना मागे सारत भाजपने सहावी जागा आपल्या पारड्यात पाडली. यानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांनी तर अजित पवारांना भाजपसोबत येण्याचं आमंत्रणच दिलं आहे.

Radhakrishna Vikhe Patil : अजितदादा परत आमच्यासोबत या, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विधानानं खळबळ
Follow us on

मुंबई : भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी केलेल्या वक्तव्यानं चर्चांना उधाण आलंय. अजितदादा परत आमच्यासोबत या, असं विधान त्यांनी केलंय. या विधानानं महाराष्ट्राच्या राजकारण पुन्हा खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबाबत प्रश्न विचारला असता राधाकृष्ण विखे पाटील यांनी अजितदादांचं कौतुक केलंय. तसंच त्यांना पुन्हा सोबत येण्याच सल्लाही दिलाय. पुष्कर श्रोत्री यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीमध्ये त्यांनी हे विधान केलंय. दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेलं हे विधान त्यांचं वैयक्तिक मत आहे, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलंय.

नेमकं काय म्हणाले विखे पाटील?

पुष्कर श्रोत्री यांनी विखे पाटील यांना प्रश्न विचारताच, राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय की…. “अजितदादा परत आमच्यासोबत या, अजित पवार स्पष्टवक्ते आहेत, त्यांची कमिटमेन्ट आहे! त्यांना माझा एवढाच सल्ला आहे, आता परत तुम्ही बरोबर या, हाच मला त्यांना सल्ला द्यायचाय! बरोबर या, असा मला त्यांना सल्ला द्यायचाय…”

नुकतंच राज्यसभा निवडणूक पार पडली यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षांना मागे सारत भाजपने सहावी जागा आपल्या पारड्यात पाडली. यानंतर विविध राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांनी तर अजित पवारांना भाजपसोबत येण्याचं आमंत्रणच दिलं आहे.

हे सुद्धा वाचा

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्याची राजकीय गणितं बदलली. अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जात पहाटेचा शपथविधी केला. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. त्यामुळे आताही अजित पवारांनी आमच्या सोबत यावं, असं आमंत्रण राधाकृष्ण विखे पाटील दिलं आहे.