कुणाला कुठलं खातं द्यायचं यासाठी वेळ लागतोय, पण येत्या दोन दिवसात खातेवाटप होईल- विजयकुमार गावित

| Updated on: Aug 12, 2022 | 12:13 PM

Vijaykumar Gavit : मंत्रिमंडळ विस्तार नुकताच झाला. नेत्यांनी मंत्रीपदाच्या गोपनियतेची शपथ घेतली. पण खातेवाटप जाहीर झालेलं नाही. त्यावरुन विरोधक टिका करत आहेत. त्यावर आता नंदुरबारचे आमदार विजयकुमार गावित यांनी भाष्य केलंय.

कुणाला कुठलं खातं द्यायचं यासाठी वेळ लागतोय, पण येत्या दोन दिवसात खातेवाटप होईल- विजयकुमार गावित
Follow us on

मुंबई : मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) नुकताच झाला. नेत्यांनी मंत्रीपदाच्या गोपनियतेची शपथ घेतली. पण खातेवाटप जाहीर झालेलं नाही. त्यावरुन विरोधक टिका करत आहेत. त्यावर आता नंदुरबारचे आमदार विजयकुमार गावित (Vijaykumar Gavit) यांनी भाष्य केलंय. लवकरच खातेवाटप जाहीर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. “पुढील दोन दिवसात खाते वाटप होणार आहे. 20 मंत्री आणि जादा खाते असल्याने वाटपाला वेळ लागतोय.कायमस्वरूपी कोणते आणि नंतर येणाऱ्याला कोणते खाते द्यायचे यावरून वेळ लागतोय. जळगाव, वाशीम, गडचिरोली, नंदुरबारचे पालकमंत्री राहिलो त्यामुळे जी जबाबदारी देतील ती पार पाडेल. आदिवासी ना पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी धोरणात बदल करावे लागेल. हे सरकार दळणवळण सोयी उपलब्ध करून देणार आहे. मधल्या काळात काही कामं झाली नाहीत. कोणत्या राजकीय नेत्यावर आरोप होत नाहीत? न्यायालय आहे, सरकार आहे ते माझ्या बाबत निर्णय घेतील”, असं विजयकुमार गावित म्हणालेत.

मंत्रिमंडळ विस्तार नुकताच झाला. नेत्यांनी मंत्रीपदाच्या गोपनियतेची शपथ घेतली. पण खातेवाटप जाहीर झालेलं नाही. त्यावरुन विरोधक टिका करत आहेत. त्यावर आता आमदार विजयकुमार गावित यांनी भाष्य केलंय. लवकरच खातेवाटप जाहीर होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

हे सुद्धा वाचा

“पुढील दोन दिवसात खाते वाटप होणार आहे. 20 मंत्री आणि जादा खाते असल्याने वाटपाला वेळ लागतोय.कायमस्वरूपी कोणते आणि नंतर येणाऱ्याला कोणते खाते द्यायचे यावरून वेळ लागतोय. जळगाव, वाशीम, गडचिरोली, नंदुरबारचे पालकमंत्री राहिलो त्यामुळे जी जबाबदारी देतील ती पार पाडेल. आदिवासी ना पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी धोरणात बदल करावे लागेल. हे सरकार दळणवळण सोयी उपलब्ध करून देणार आहे. मधल्या काळात काही कामं झाली नाहीत. कोणत्या राजकीय नेत्यावर आरोप होत नाहीत? न्यायालय आहे, सरकार आहे ते माझ्या बाबत निर्णय घेतील”, असं विजयकुमार गावित म्हणालेत.

मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात बच्चू कडू यांचं नाव आलं नाही. तर हा केवळ पहिला टप्पा असून त्यांना दुसऱ्या टप्प्यात संधी मिळेल पण हे सर्व अधिकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडेच असतात असं म्हणत केसरकरांनी दुहेरी भूमिका घेतली आहे. मंत्रिमंडळात आपली वर्णी लागणार असल्याचा विश्वास व्यक्त करीत आपल्याला ग्रामीण भागाशी संबंधित खात्यामध्ये काम करण्यास आवडेल असेही कडूंनी सांगितले होते. पण मंत्रिमंडळातच समावेश झाला नसल्यानं ते नाराजी लपून राहिलेली नाही. तर त्यांची मनधरणी आता सर्वच नवनियुक्त मंत्र्यांकडून केली जाणार आहे. त्यामुळे या सर्व मंत्र्यांचा त्यांच्यावर कितपत परिणाम होणार हे देखील पहावं लागणार आहे.