AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

23 मेनंतर या दोन राज्यात काँग्रेसचं सरकार पडणार?

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर राज्यस्तरावरच्या राजकारणालाही वेग आलाय. मध्य प्रदेशात भाजपने मुख्यमंत्री कमलनाथ यांचं सरकार अल्पमतात असल्याचा दावा केलाय. भाजपने राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना पक्ष लिहून विधानसभेच्या विशेष सत्राची मागणी केली आहे. तर कर्नाटकातही हीच परिस्थिती आहे. काँग्रेसचे 20 आमदार कोणत्याही परिस्थितीत मोठा निर्णय घेऊ शकतात, असा दावा काही दिवसांपूर्वीच भाजपकडून करण्यात […]

23 मेनंतर या दोन राज्यात काँग्रेसचं सरकार पडणार?
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM
Share

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलनंतर राज्यस्तरावरच्या राजकारणालाही वेग आलाय. मध्य प्रदेशात भाजपने मुख्यमंत्री कमलनाथ यांचं सरकार अल्पमतात असल्याचा दावा केलाय. भाजपने राज्यपाल आनंदीबेन पटेल यांना पक्ष लिहून विधानसभेच्या विशेष सत्राची मागणी केली आहे. तर कर्नाटकातही हीच परिस्थिती आहे. काँग्रेसचे 20 आमदार कोणत्याही परिस्थितीत मोठा निर्णय घेऊ शकतात, असा दावा काही दिवसांपूर्वीच भाजपकडून करण्यात आला होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर दोन राज्यांमध्ये सत्तांतर होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय.

मध्य प्रदेशातील परिस्थिती काय आहे?

मध्य प्रदेशात काँग्रेसचं सरकार अल्पमतात असल्याचं विरोधी पक्षनेते गोपाल भार्गव यांनी म्हटलंय. कमलनाथ सरकार आपोआप पडणार आहे. माझा घोडेबाजारावर विश्वास नाही. पण सरकार पडण्याची वेळ आली आहे आणि ते लवकरच पडेल. आम्ही विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावण्यासाठी राज्यपालांना विनंती करणार आहोत, असं गोपाल भार्गव म्हणाले. काँग्रेसचे काही आमदार कमलनाथ यांच्या सरकारवर नाराज असल्याचा भार्गव यांचा दावा आहे.

काँग्रेसचं भाजपला उत्तर

मध्य प्रदेश सरकार बहुमतात असून काँग्रेसने दिवसा स्वप्न पाहणं बंद करावं, असं उत्तर काँग्रेसने दिलंय. संसदीय नियमानुसार आमदारांच्या मागणीनंतर किंवा मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीनंतरच विशेष सत्र बोलावलं जाऊ शकतं, असं काँग्रेस नेते मुकेश नायक यांनी सांगितलं.

मध्य प्रदेश विधानसभेतील समीकरण

2018 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा मध्य प्रदेशात तब्बल 15 वर्षांनी पराभव झाला. 230 सदस्य असलेल्या विधानसभेत काँग्रेसला 114, भाजपला 109, बसपा 02, सपा 01 आणि 04 अपक्षांनी विजय मिळवला होता. बसपा आणि इतर अपक्ष आमदारांनी कमलनाथ यांना पाठिंबा दिला. त्यामुळे बहुमतापासून दूर असलेल्या काँग्रेसने सरकार स्थापन केलं.

कर्नाटकातही सत्तापालट?

मध्य प्रदेशप्रमाणे कर्नाटकातही काँग्रेस आणि जेडीएस यांनी सत्ता स्थापन केली होती. कर्नाटकात भाजप मोठा पक्ष ठरला असताना काँग्रेसने भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जेडीएसला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आणि सत्ता स्थापन केली. पण काँग्रेसचे 20 आमदार नाराज असून ते कोणत्याही क्षणी मोठा निर्णय घेऊ शकतात, असा दावा भाजपचे कर्नाटकातील प्रमुख नेते बीएस येदियुरप्पा यांनी केलाय.

कर्नाटकातील सरकार गेल्या अनेक महिन्यांपासून पडणार अशी चर्चा आहे. कारण, अत्यंत काठावरचं बहुमत या सरकारकडे आहे. काँग्रेस 78, जेडीएस 37 आणि बसपा 01 अशा 116 जागांसह सध्या सरकार आहे. विरोधात असलेल्या भाजपकडे 104 जागा आहेत. तर दोन अपक्षांचा पाठिंबा असल्याचा भाजपचा दावा आहे. त्यामुळे 113 या मॅजिक फिगरच्या भाजप जवळ जाताना दिसत आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...