AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! चीनने अखेर मान्य केली भारताची ताकद, युद्ध सुरू असतानाच थेट मोठं वक्तव्य

अमेरिका इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे मध्यपूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. आता या युद्धाच्या पार्श्वभूमीवर चीनकडून भारताबद्दल मोठं वक्तव्य करण्यात आलं आहे.

मोठी बातमी! चीनने अखेर मान्य केली भारताची ताकद, युद्ध सुरू असतानाच थेट मोठं वक्तव्य
xi jinping Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 08, 2026 | 4:24 PM
Share

मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे, भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धाचा फटका केवळ अमेरिका, इस्त्रायल आणि इराण या देशांनाच बसत नाहीयेत, तर जगभरातील अनेक देशांना या युद्धाचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष फटका बसत आहे. या युद्धाच्या तडाख्यामधून भारत, चीन सारखे देश देखील सुटले नाहीये. जर युद्ध आणखी काही दिवस सुरूच राहिलं तर इंधन टंचाई निर्माण होण्याची भीती सतावत आहे. दरम्यान एकीकडे युद्ध सुरू आहे, तर दुसरीकडे आता चीनमधून मोठी बातमी समोर आली आहे. चीनेचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी भारत आणि चीनमधील सुधारत असलेल्या संबंधांबाबत मोठं विधान केलं आहे. भारत आणि चीन यांनी एकमेकांचे प्रतिस्पर्धी न बनता एकमेकांचे व्यापारातील भागीदार बनलं पाहिजे, तसेच धोका नाही तर संधी म्हणून विचार केला पाहिजे, असं त्यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते असं देखील म्हटले आहेत की, भारत आणि चीन हे दोन्ही देश एकमेकांचे महत्त्वपूर्ण शेजारी देश आहेत. दोन्ही देश ग्लोबल साऊथचे सदस्य असून, दोन्ही देशांचे खोलवर सांस्कृतिक संबंध आणि व्यापक अशा स्वरुपाचे सामायिक हितसंबंध आहेत. ते बीजिंगमध्ये आयोजित 14 व्या नॅशनल पीपल्स काँग्रेसच्या अधिवेशनादरम्यान आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

शिन्हुआ न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना भारत चीन संबंधांवर बोलताना चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी मोठं विधान केलं आहे. भारत आणि चीनच्या संबंधांवर बोलताना त्यांनी म्हटलं की भारत आणि चीन हे एक महत्त्वाचे शेजारी देश आहेत. दोन्ही देशांमध्ये खोलवर सांस्कृतिक संबंध आणि व्यापक अशा स्वरुपाचे सामायिक हितसंबंध आहेत. दोन्ही देशांमध्ये असलेला परस्पर विश्वास, भागीदारी हे एकमेकांच्या विकासासाठी पुरक असल्याचं यावेळी वांग यी यांनी म्हटलं आहे. मात्र दोन्ही देशांमधील संघर्ष आणि प्रतिस्पर्धा ही आशिया खडांच्या विकासावर प्रतिकूल परिणाम घडवून आणू शकते असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

गेल्या वर्षी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची भेट झाली होती. या भेटीमुळे आता भारत आणि चीनचे संबंध आणखी मजबूत झाले आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची अनेक विषयांवर चर्चा झाली. दोन्ही देशांदरम्यान असलेल्या व्यापाराने आता एक नवी उंची गाठली आहे, असंही यावेळी चीनने म्हटलं आहे.

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.